शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कालव्याचे पाणी सोडले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 9:57 PM

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचा प्रताप : पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे. देवळी तालुक्यातील मौजा रायपूर येथे असाच प्रकार झाल्याने शेतातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.निम्न वर्धा प्रकल्पाचा डावा कालवा देवळी तालुक्यातून गेला आहे. सदर कालवा मौजा रायपूर येथील सर्व्हे क्र. ९९.१०० या शेताजवळ बंद करण्यात आला आहे. कालव्याचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी शेताच्या जवळ नाली करण्यात आली आहे. भविष्यात या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अतिरिक्त पाणी सदर नालीतून वाहून जाताना शेतात शिरण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. रायपूर येथील दत्तात्रय मसणे यांच्या शेताच्या धुऱ्यावरच कालव्याचे पाणी वाहून जाण्याकरिता नाली करण्यात आली आहे. नालीलगत रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर कालवा शेताजवळ बंद झालेला आहे. यामुळे कालव्यातील अतिरिक्त पाणी शेताच्या बाजूने नालीद्वारे वाहून जाणार आहे. परिणामी, मसणे यांच्या शेतातील पिकांनाच धोका निर्माण झाला आहे. सर्व्हे क्र. ९८ हे बाबाराव मसणे यांचे शेत असून या पाण्यामुळे त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत.कालव्याची कामे करताना शेतकऱ्यांशी चर्चा केली जात नाही. त्यांची कुठलीही परवानगी घेतली जात नाही वा त्यांना सूचनाही दिली जात नाही. परिणामी, सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केलेली कामे शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. तत्पूर्वी शेतकरी मसणे यांनी अनेकदा तक्रारी केल्या. त्यावर तलाठ्याकडून अहवालही मागविण्यात आला; पण अद्याप कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. यामुळे कालव्याला पाणी सोडल्यानंतर तथा पावसाळ्यात मसणे यांना शेती करणेच जिकरीचे ठरणार आहे. यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.अनेक ठिकाणी कामे अपूर्णचगत कित्येक वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू आहे; पण अद्यापही डावा कालवा पूर्णत्वास गेलेला नाही. पुलगाव शहरात अद्याप खोदकामही पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी कालव्याला पाणी सोडले जाते. परिणामी, शहरात तथा परिसरातील गावांत अनेक घटना घडल्या आहेत. देवळी तालुक्यात बहुतांश ठिकाणी कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे; पण पुलगाव शहरातील कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. शिवाय पाटचऱ्यांची कामे अद्याप सुरूही करण्यात आलेली नाहीत. यामुळे बहुतांश शेतांपर्यंत अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अद्याप सिंचनाची सुविधा झालेली नाही. निम्न वर्धा प्रकल्प कालवे विभागाने याकडेही लक्ष देत कालवा तथा पाटचऱ्या पूर्ण करणे गरजेचे आहे.मसणे यांच्या तक्रारीवरून वरिष्ठांनी मोका पाहणी केली. सदर शेताजवळ कालवा बंद केला आहे. शेताच्या शेजारून काढलेली नाली बुजवून पाटचरी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.- आर.आर. बोडेकर, उपअभियंता, निम्न वर्धा प्रकल्प, कालवे विभाग, देवळी.