वर्धा जिल्ह्यात बैलाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:28 IST2020-05-15T16:27:43+5:302020-05-15T16:28:14+5:30
वर्धा जिल्ह्यात असलेल्याकारंजा घाडगे तालुक्यातील बोदरठाणा येथील शेतकरी जनार्दन देवाशे यांच्या शेतात गुरुवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान बैलांची आपसात टक्कर झाल्याने एक बैल विहिरीत जाऊन पडला.

वर्धा जिल्ह्यात बैलाचा विहिरीत पडून मृत्यू
ठळक मुद्देदोन बैलांच्या टक्करीत झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यात असलेल्याकारंजा घाडगे तालुक्यातील बोदरठाणा येथील शेतकरी जनार्दन देवाशे यांच्या शेतात गुरुवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान बैलांची आपसात टक्कर झाल्याने एक बैल विहिरीत जाऊन पडला. ही विहीर ७० फूट खोल असून ती पुरुषोत्तम गाडगे यांच्या मालकीची आहे. या खोल विहिरीत त्याला मार लागल्याने तो विहिरीतच मरण पावला. यामुळे देवाशे यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यासाठी बैल हा उजवा हात मानला जातो. अशा परिस्थितीत बैल मरण पावल्याने या शेतकऱ्यांचे काम ठप्प झाले आहे.