यशोदा नदीवरील पूल पूर्णत्वाकडे
By Admin | Updated: June 25, 2015 02:10 IST2015-06-25T02:10:09+5:302015-06-25T02:10:09+5:30
यशोदा नदीवरील पूल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यशोदा नदीवरील पूल पूर्णत्वाकडे
अल्लीपूर ते टाकळी मार्ग : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळणार दिलासा
अल्लीपूर : यशोदा नदीवरील पूल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
२००७ मध्ये माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी नाबार्ड अंतर्गत ३.५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्याची निविदा २०११-१२ मध्ये काढण्यात आली; पण निधी नसल्याने पुलाचे बांधकाम पुढे ढकलले गेले. यानंतर आ. रणजीत कांबळे यांच्या उपस्थितीत काम सुरु झाले व जून महिन्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आहे. अद्याप पुलावरील कठडे, साईज, पिचींग, रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. वर्षभरात वाहतुकीच्या दृष्टीने पूल व रस्ता दुरूस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी आहे. हिंगणघाट-देवळी हा ग्रामीण मार्ग सर्वात कमी अंतराचा आहे. यामुळे सोयीचा होणार आहे. पुलापासून टाकळी मार्गाचे नऊ किमी रस्ता होणे गरजेचे आहे.(वार्ताहर)