शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वरात आली दारावर; वधूचा जीव जडला प्रियकरावर, विवाह मंडपातून पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 13:07 IST

नवरदेवाची पुलगाव पोलिसात तक्रार

रोहणा (वर्धा) : विवाह म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आपल्या जीवनसाथीसोबत सात फेरे घेण्याचे स्वप्न रंगवत, या क्षणाचे साक्षीदार होणाऱ्या वऱ्हाड्यांसह नवरदेवाची वरात वधू मंडपी दाखल झाली. पण, जिच्यासाठी हा सर्व खटोटोप केला तिचा जीव प्रियकरावर जडल्याने नवरदेवाला आल्या पावलीच परतावे लागले. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्याची वेळ आली. हा धक्कादायक प्रकार रोहणा येथे गुरुवारी घडला असून, दिवसभर परिसरात याचीच चर्चा होती.

आर्वी तालुक्यातील सायखेडा येथील तरुणाचा विवाह अमरावती जिल्ह्यातील नवीन वाठोडा गावातील मुलीसोबत ठरला होता. विवाहापूर्वीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर विवाहाकरिता रोहणा येथील वनसंपदा मंगल कार्यालय ठरविण्यात आले. विवाहाची तारीख निश्चित करून आप्तेष्टांना निमंत्रण पत्रिकाही पाठविल्या. त्यामुळे या विवाहाची वधू-वर अशा दोन्ही पक्षांकडे धुमधडाक्यात तयारी सुरू होती. परंतु, मुलीच्या मनात काही वेगळंच चाललयं, याचा कुणाला साधा संशयही आला नाही.

गुरुवार, ३० मार्च रोजी सकाळी ११:०५ वाजता विवाह मुहूर्त असल्यामुळे वधूसह तिच्याकडील सर्व मंडळी बुधवारी रात्रीच रोहण्याच्या सभागृहात दाखल झाले होते. त्यांनी रात्रीपासूनच आजच्या विवाहाची तयारी चालविली होती. वराकडील मंडळीही गुरुवारी विवाह असल्याने ठरलेल्या वेळेपर्यंत वाजत-गाजत वधू मंडपी पोहोचली. परंतु, विवाहाची वेळ झाल्यानंतरही वधू येत नसल्याने अनेकांना प्रश्न पडला. काही वेळात सभागृहात काळजीचे वातावरण निर्माण झाले. वधू पक्षाकडील लोकांनाही कोणतीच कल्पना नसल्याने तेही शोधाशोध करू लागले.

दुपारी ३ वाजले तरीही वधूचा काहीच पत्ता नसल्याने अखेर विवाहस्थळी खळबळ उडाली. तेव्हा वधूने पहाटेच संधी साधून प्रियकरासोबत पलायन केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे संतापलेल्या वर मंडळींनी विवाहस्थळ सोडून थेट पुलगाव पोलिस ठाणे गाठले. वधूच्या या निर्णयामुळे वधू आणि वर पक्षाकडील मंडळींची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे विवाहस्थळी शांतता पसरली होती. वऱ्हाड्यांकरिता केलेला स्वयंपाकही वाया गेला. काहींनी जेवण केले तर काही तसेच निघून गेले. वराकडील झालेला खर्चही व्यर्थ गेला. आता पुलगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नwardha-acवर्धा