शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वरात आली दारावर; वधूचा जीव जडला प्रियकरावर, विवाह मंडपातून पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 13:07 IST

नवरदेवाची पुलगाव पोलिसात तक्रार

रोहणा (वर्धा) : विवाह म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आपल्या जीवनसाथीसोबत सात फेरे घेण्याचे स्वप्न रंगवत, या क्षणाचे साक्षीदार होणाऱ्या वऱ्हाड्यांसह नवरदेवाची वरात वधू मंडपी दाखल झाली. पण, जिच्यासाठी हा सर्व खटोटोप केला तिचा जीव प्रियकरावर जडल्याने नवरदेवाला आल्या पावलीच परतावे लागले. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्याची वेळ आली. हा धक्कादायक प्रकार रोहणा येथे गुरुवारी घडला असून, दिवसभर परिसरात याचीच चर्चा होती.

आर्वी तालुक्यातील सायखेडा येथील तरुणाचा विवाह अमरावती जिल्ह्यातील नवीन वाठोडा गावातील मुलीसोबत ठरला होता. विवाहापूर्वीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर विवाहाकरिता रोहणा येथील वनसंपदा मंगल कार्यालय ठरविण्यात आले. विवाहाची तारीख निश्चित करून आप्तेष्टांना निमंत्रण पत्रिकाही पाठविल्या. त्यामुळे या विवाहाची वधू-वर अशा दोन्ही पक्षांकडे धुमधडाक्यात तयारी सुरू होती. परंतु, मुलीच्या मनात काही वेगळंच चाललयं, याचा कुणाला साधा संशयही आला नाही.

गुरुवार, ३० मार्च रोजी सकाळी ११:०५ वाजता विवाह मुहूर्त असल्यामुळे वधूसह तिच्याकडील सर्व मंडळी बुधवारी रात्रीच रोहण्याच्या सभागृहात दाखल झाले होते. त्यांनी रात्रीपासूनच आजच्या विवाहाची तयारी चालविली होती. वराकडील मंडळीही गुरुवारी विवाह असल्याने ठरलेल्या वेळेपर्यंत वाजत-गाजत वधू मंडपी पोहोचली. परंतु, विवाहाची वेळ झाल्यानंतरही वधू येत नसल्याने अनेकांना प्रश्न पडला. काही वेळात सभागृहात काळजीचे वातावरण निर्माण झाले. वधू पक्षाकडील लोकांनाही कोणतीच कल्पना नसल्याने तेही शोधाशोध करू लागले.

दुपारी ३ वाजले तरीही वधूचा काहीच पत्ता नसल्याने अखेर विवाहस्थळी खळबळ उडाली. तेव्हा वधूने पहाटेच संधी साधून प्रियकरासोबत पलायन केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे संतापलेल्या वर मंडळींनी विवाहस्थळ सोडून थेट पुलगाव पोलिस ठाणे गाठले. वधूच्या या निर्णयामुळे वधू आणि वर पक्षाकडील मंडळींची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे विवाहस्थळी शांतता पसरली होती. वऱ्हाड्यांकरिता केलेला स्वयंपाकही वाया गेला. काहींनी जेवण केले तर काही तसेच निघून गेले. वराकडील झालेला खर्चही व्यर्थ गेला. आता पुलगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नwardha-acवर्धा