शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

महिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाजप देणार धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिरीष गोडे। २५ फेब्रुवारीला तहसीलसमोर देणार धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढता अत्याचाराच्या निषेध नोंदविण्यासाठी तसेच समाजातील याच घटकांच्या विविध समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने २५ फेबु्रवारीला वर्धा जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. भाजपचा विश्वासघात करणारी शिवसेना कर्जमाफीच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांचीही फसवणूकच करू पाहत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव शासकीय मदतीचे आश्वासन सध्या आश्वासनच ठरत आहे. फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांना या महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती देऊन नागरिकांच्या अडचणीत भर टाकली.एकूणच राज्यातील हे सरकार फसवणुकीचे धोरण अवलंबत असल्याचे डॉ. गोडे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खा. रामदास तडस, नितीन मडावी, अतुल तराळे, किशोर दिघे, मिलिंद भेंडे, विलास कांबळे, अविनाश देव, पवन परियाल उपस्थित होते.जळीत प्रकरणाकडे लक्ष वेधणार- तडसहिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे तसेच विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याबाबतचे पत्र पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. शिवाय पीडितेच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंगणघाट जळीत प्रकरणासह महिलांवरील वाढण्यात अत्याचाराच्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे असे खा. रामदास तडस यांनी सांगितले.भाजप आमदार देणार विधानभवनात ठिय्या२५ फेब्रुवारीचे हे आंदोलन राज्यव्यापी आहे. तर २४ फेबु्रवारीला मुंबई येथे बैठक असल्याने जिल्ह्यातील भाजपचे तिन्ही आमदार मुंबई येथे राहतील. असे असले तरी हे तिन्ही आमदार मुुंबईतील विधानभवनासमोर धरणे देऊन राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध नोंदविणार असल्याचेही यावेळी डॉ. गोडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRamdas Tadasरामदास तडस