शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

महिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाजप देणार धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिरीष गोडे। २५ फेब्रुवारीला तहसीलसमोर देणार धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढता अत्याचाराच्या निषेध नोंदविण्यासाठी तसेच समाजातील याच घटकांच्या विविध समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने २५ फेबु्रवारीला वर्धा जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. भाजपचा विश्वासघात करणारी शिवसेना कर्जमाफीच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांचीही फसवणूकच करू पाहत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव शासकीय मदतीचे आश्वासन सध्या आश्वासनच ठरत आहे. फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांना या महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती देऊन नागरिकांच्या अडचणीत भर टाकली.एकूणच राज्यातील हे सरकार फसवणुकीचे धोरण अवलंबत असल्याचे डॉ. गोडे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खा. रामदास तडस, नितीन मडावी, अतुल तराळे, किशोर दिघे, मिलिंद भेंडे, विलास कांबळे, अविनाश देव, पवन परियाल उपस्थित होते.जळीत प्रकरणाकडे लक्ष वेधणार- तडसहिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे तसेच विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याबाबतचे पत्र पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. शिवाय पीडितेच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंगणघाट जळीत प्रकरणासह महिलांवरील वाढण्यात अत्याचाराच्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे असे खा. रामदास तडस यांनी सांगितले.भाजप आमदार देणार विधानभवनात ठिय्या२५ फेब्रुवारीचे हे आंदोलन राज्यव्यापी आहे. तर २४ फेबु्रवारीला मुंबई येथे बैठक असल्याने जिल्ह्यातील भाजपचे तिन्ही आमदार मुंबई येथे राहतील. असे असले तरी हे तिन्ही आमदार मुुंबईतील विधानभवनासमोर धरणे देऊन राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध नोंदविणार असल्याचेही यावेळी डॉ. गोडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRamdas Tadasरामदास तडस