शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

सातच महाविद्यालयात बायोमेट्रिक मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:45 IST

कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. आता या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील ६२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ सातच महाविद्यालयाने बायोमेट्रिक

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५५ महाविद्यालयांकडून कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. आता या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील ६२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ सातच महाविद्यालयाने बायोमेट्रिक लावल्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला आहे. मात्र, येथे बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेतली जातात का? हा सशोधनाचा विषय ठरत आहे.कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घेऊन कोचिंग क्लासेमणध्ये गर्दी करणाऱ्या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला. १५ जून २०१८ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने सुरु करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले. शिक्षण विभागाने महाविद्यालयांना पत्र पाठवून बायोमेट्रिक लावण्याबाबतचा अहवाल मागविला. परंतु, दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी महाविद्यालयाने अहवाल सादर केला नाही. केवळ सातच महाविद्यालयाने अहवाल पाठवून बायोमेट्रीक लावल्याचे शिक्षण विभागाला कळविले. अजुनही जिल्ह्यातील जवळपास ५५ महाविद्यालयाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकमतच्या वृत्तानंतर शिक्षण विभाग लागला कामालाबायोमेट्रिक हजेरी योजना टप्प्या-टप्प्याने कार्यन्वित करण्याचा निर्णय घेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागातील सर्व विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घ्यायचे निर्देश दिले होते. परंतु, या पहिल्या टप्प्यातच या योजनेचा बोजवारा उडाल्याचे वृत्त लोकमत प्रकाशित करुन जिल्ह्यातील वास्तविकता मांडताच माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला. शिक्षण विभागाकडून महाविद्यालयाना २४ व २९ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. असे असले तरी या पत्रालाच अनेकजण फाटा देत आहेत.जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली दखलजिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरीला ठेंगा दाखविला जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी दखल घेत यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांंना पत्र दिले. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात विज्ञान महाविद्यालयांची संंख्या किती. किती महाविद्यालयाने बायोमेट्रिक प्रणाली लावली आणि किती महाविद्यालयाने लावली नाही, अशा सर्व महाविद्यालयांची नावे सांगावी. तसेच न लावणाºया महाविद्यालयांवर शिक्षण विभागाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली. याची सविस्तर माहिती सादर करण्याची मागणी पत्रातून केली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागासह महाविद्यालयांचेही धाबे दणाणले आहे.महाविद्यालयांना पत्र देऊन अवगत करण्यात आले आहे. सात महाविद्यालयांनी मशीन लावल्याबाबत अहवाल सादर केला. उर्वरीत महाविद्यालयांना ३० आॅगस्टपर्यंत कालावधी देण्यात आला होता. आता ज्यांंनी मशीन लावली नाही त्यांची संचमान्यता रोखणे तसेच मान्यताही काढण्याबाबत कारवाई केली जाईल. तसेच जेथे बायोमेट्रीक लावल्या तेथील तपासणी केली जाईल.- रवींद्र टेंभरे, सहा.शिक्षण उपनिरिक्षक, जि.प. वर्धा.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय