शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सातच महाविद्यालयात बायोमेट्रिक मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:45 IST

कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. आता या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील ६२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ सातच महाविद्यालयाने बायोमेट्रिक

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५५ महाविद्यालयांकडून कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. आता या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील ६२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ सातच महाविद्यालयाने बायोमेट्रिक लावल्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला आहे. मात्र, येथे बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेतली जातात का? हा सशोधनाचा विषय ठरत आहे.कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घेऊन कोचिंग क्लासेमणध्ये गर्दी करणाऱ्या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला. १५ जून २०१८ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने सुरु करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले. शिक्षण विभागाने महाविद्यालयांना पत्र पाठवून बायोमेट्रिक लावण्याबाबतचा अहवाल मागविला. परंतु, दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी महाविद्यालयाने अहवाल सादर केला नाही. केवळ सातच महाविद्यालयाने अहवाल पाठवून बायोमेट्रीक लावल्याचे शिक्षण विभागाला कळविले. अजुनही जिल्ह्यातील जवळपास ५५ महाविद्यालयाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकमतच्या वृत्तानंतर शिक्षण विभाग लागला कामालाबायोमेट्रिक हजेरी योजना टप्प्या-टप्प्याने कार्यन्वित करण्याचा निर्णय घेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागातील सर्व विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घ्यायचे निर्देश दिले होते. परंतु, या पहिल्या टप्प्यातच या योजनेचा बोजवारा उडाल्याचे वृत्त लोकमत प्रकाशित करुन जिल्ह्यातील वास्तविकता मांडताच माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला. शिक्षण विभागाकडून महाविद्यालयाना २४ व २९ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. असे असले तरी या पत्रालाच अनेकजण फाटा देत आहेत.जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली दखलजिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरीला ठेंगा दाखविला जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी दखल घेत यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांंना पत्र दिले. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात विज्ञान महाविद्यालयांची संंख्या किती. किती महाविद्यालयाने बायोमेट्रिक प्रणाली लावली आणि किती महाविद्यालयाने लावली नाही, अशा सर्व महाविद्यालयांची नावे सांगावी. तसेच न लावणाºया महाविद्यालयांवर शिक्षण विभागाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली. याची सविस्तर माहिती सादर करण्याची मागणी पत्रातून केली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागासह महाविद्यालयांचेही धाबे दणाणले आहे.महाविद्यालयांना पत्र देऊन अवगत करण्यात आले आहे. सात महाविद्यालयांनी मशीन लावल्याबाबत अहवाल सादर केला. उर्वरीत महाविद्यालयांना ३० आॅगस्टपर्यंत कालावधी देण्यात आला होता. आता ज्यांंनी मशीन लावली नाही त्यांची संचमान्यता रोखणे तसेच मान्यताही काढण्याबाबत कारवाई केली जाईल. तसेच जेथे बायोमेट्रीक लावल्या तेथील तपासणी केली जाईल.- रवींद्र टेंभरे, सहा.शिक्षण उपनिरिक्षक, जि.प. वर्धा.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय