शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

सावधान ! बोगस खत व बियाण्यांचा शिरकाव

By admin | Updated: June 5, 2015 02:06 IST

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्याची लगबग जोरात सुरू आहे.

शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सर्तकतेचा इशारा : सर्व प्रकारची बियाणे व खतसाठा मुबलक प्रमाणातवर्धा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्याची लगबग जोरात सुरू आहे. बाजारात शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. नेमक्या याच संधीचा फायदा घेत बोगस बियाणे व खतांचा जिल्ह्यात शिरकाव झाला असल्याची कृषी विभागाची माहिती असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगामाच्या कालावधीत बाजारामध्ये एकदम उसळणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीचा व त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काही खोडसाळ बियाणे, खते उत्पादक कंपन्या, वितरक, विक्रेते यांच्याकडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस व बेकायदेशीर बियाण्यांच्या उत्पादनाला व विक्रीला शासनाची परवानगी नसते. अशा बियाण्यांच्या उत्पन्नासंबंधी मनमुराद व खोटे दावे करून शेतकऱ्यांना आमिष दाखविण्यात येते. अशा बियाण्यांच्या व्यवहारामध्ये शासनमान्य दराचे अधिकृत देयक शेतकऱ्याला दिले जात नाही. अशा बियाण्यांच्या पाकिटावर बियाण्यांच्या गुणवत्तेचा तपशिल व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो. अशा बियाण्यांच्या परीक्षणपूर्व वापरामुळे जमिनीवर तथा पर्यावरणावर विपरित परिणाम होवू शकतो. अशा अनधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाईची हमी शासन किंवा ग्राहक मंच सुद्धा घेवू शकत नाही. एकदा फसवणूक झाल्यानंतर या परिस्थितीवर मात करुन शेतीचा हंगाम करणे अवघड होईल. तेव्हा आताच शेतकऱ्यांनी सावध होऊन परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करावी, अशी माहिती जि.प. कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.(जिल्हा प्रतिनिधी)खत, बियाणे व किटकनाशक खरेदी करताना पक्के देयक घ्यावे कुठलेही रासायनिक खत, बियाणे व किटकनाशकाच्या अधिकृत व परवानाधारक विके्रत्यांकडूनच खरेदी करीत त्यांना पक्क्या देयकाचा आग्रह धरण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. विक्रेता पक्के देयक देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलही शंका, तक्रार असल्यास १८००२३३४००० व ०७१५२-२५००९९ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर लगेच संपर्क साधून तक्रार नोंदवावी. देयकावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशिल नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. बियाणे तुटवड्याच्या नावावर अफवा पसरविण्याची शक्यताखरेदी केलेल्या बियाण्याचे पाकिट सिलबंद, मोहोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करा. बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या अंतिम मुदतीची तारीख पाहूनच पाकिट, बॅग खरेदी करा. एम.आर.पी. पेक्षा अधिक किंमतीने विक्री संबंधात त्वरीत कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. रासायनिक खत खरेदी करताना बॅग वरील एम.आर.पी. किंमत बघुनच खरेदी करावी. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारची बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी खास वाणांचा तुटवडा असल्यास अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. तसेच काही कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रलोभनावर विश्वास ठेऊ नये.आर. आर. नावाचे बीटी बियाणे बोगस - कृषी विकास अधिकारीबाजारात किंवा इतर व्यक्तीद्वारे महाशक्ती आर.आर. किंवा बी.जी.-३ इत्यादी नावाने बियाणे जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नावाने कोणतेही अनधिकृत कंपनीचे किंवा इतर प्रतिनिधीद्वारे पेरणीसाठी बियाण्यांचा आग्रह केला जाऊ शकतो. अशी बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्यांचे कोणतेही देयक किंवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी बोलताना दिली.