शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी डिसेंबरमध्ये आरपारची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:08 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे.

ठळक मुद्देवामनराव चटप : विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागणार

आॅनलाईन लोकमतवर्धा : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे. सदर विदर्भ हडताल आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी विदर्भातील प्रत्येक तालुक्यात बैठका सुरू झाल्या आहेत. ही विदर्भ राज्यासाठीची आरपारची लढाई असून या आंदोलनादरम्यान आम्ही विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहोत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.चटप पुढे म्हणाले, विरोधात असताना व निवडणुकीच्या कालावधीत विदर्भ वेगळा करू असे आश्वासन देणारे ना. नितीन गडकरी सत्तेत आल्यापासून चूप होते. मात्र, नुकतेच त्यांनी वेगळे राज्य होण्यासाठी विदर्भ सक्षम नसल्याचे प्रतिपादन केले आहे. विदर्भाच्या वाट्याचा पैसा नेहमीच पश्चिम महाराष्ट्राने पळविला. त्यामुळे खºया अर्थाने विदर्भाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. असे असले तरी सध्या स्थितीत ४ लाख ७४ हजार ४०० कोटींचे कर्ज असलेला महाराष्ट्र तरी सक्षम आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.नक्षलग्रस्त भागात ९८४ जणांचे मृत्यू झाले. त्यात पोलीस, नक्षलवादी व सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. नोकरीसाठी विदर्भातील अनेक नागरिक स्थानांतरीत झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे विदर्भातील चार आमदार व एक खासदार कमी झाले. ज्या ठिकाणी कापसाचा शोध लागला त्याच वºहाड भागात सर्वाधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव असल्याने हा भाग सध्या शेतकरी आत्महत्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जात आहे. २६ पैकी २३ खनिज विदर्भात आहे. शिवाय ५४ टक्के वनजमीन विदर्भात आहे;पण त्याचा खरा लाभ विदर्भा शिवाय दुसºयांनीच घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या या विषयावर लोकसभेत झालेल्या चर्चेत एका खासदाराने विदर्भातील शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले. यावेळी विदर्भातील एकाही खासदाराने त्याला प्रतीउत्तर दिले नाही. ही निंदनिय बाब असून त्यामुळे आम्ही आंदोलनादरम्यान विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहो. गत सात वर्षांपासून अनुकंपाची नोकर भर्ती बंद आहे. शिवाय पगार देण्यासाठी पैसेच नसल्याने उच्च न्यायालयातील ४३८ पदे रिक्त आहे. वेगळे विदर्भ राज्य झाले पाहिजे ही विदर्भातील नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला विदर्भ माझा, विदर्भ राज्य आघाडी, जनसुराज्य पार्टी व विदर्भ गण परिषदेने पाठींबा दिला आहे. या आंदोलनात विदर्भातील व्यापारी संघटनांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी वामनराव चटप यांनी केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार सरोज काशीकर, निळकंठ घवघवे, राम नवले, अभिजीत लाखे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, अरविंद राऊत, जि.प. सदस्य गजानन निकम आदींची उपस्थिती होती.