शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी डिसेंबरमध्ये आरपारची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:08 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे.

ठळक मुद्देवामनराव चटप : विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागणार

आॅनलाईन लोकमतवर्धा : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे. सदर विदर्भ हडताल आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी विदर्भातील प्रत्येक तालुक्यात बैठका सुरू झाल्या आहेत. ही विदर्भ राज्यासाठीची आरपारची लढाई असून या आंदोलनादरम्यान आम्ही विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहोत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.चटप पुढे म्हणाले, विरोधात असताना व निवडणुकीच्या कालावधीत विदर्भ वेगळा करू असे आश्वासन देणारे ना. नितीन गडकरी सत्तेत आल्यापासून चूप होते. मात्र, नुकतेच त्यांनी वेगळे राज्य होण्यासाठी विदर्भ सक्षम नसल्याचे प्रतिपादन केले आहे. विदर्भाच्या वाट्याचा पैसा नेहमीच पश्चिम महाराष्ट्राने पळविला. त्यामुळे खºया अर्थाने विदर्भाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. असे असले तरी सध्या स्थितीत ४ लाख ७४ हजार ४०० कोटींचे कर्ज असलेला महाराष्ट्र तरी सक्षम आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.नक्षलग्रस्त भागात ९८४ जणांचे मृत्यू झाले. त्यात पोलीस, नक्षलवादी व सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. नोकरीसाठी विदर्भातील अनेक नागरिक स्थानांतरीत झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे विदर्भातील चार आमदार व एक खासदार कमी झाले. ज्या ठिकाणी कापसाचा शोध लागला त्याच वºहाड भागात सर्वाधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव असल्याने हा भाग सध्या शेतकरी आत्महत्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जात आहे. २६ पैकी २३ खनिज विदर्भात आहे. शिवाय ५४ टक्के वनजमीन विदर्भात आहे;पण त्याचा खरा लाभ विदर्भा शिवाय दुसºयांनीच घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या या विषयावर लोकसभेत झालेल्या चर्चेत एका खासदाराने विदर्भातील शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले. यावेळी विदर्भातील एकाही खासदाराने त्याला प्रतीउत्तर दिले नाही. ही निंदनिय बाब असून त्यामुळे आम्ही आंदोलनादरम्यान विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहो. गत सात वर्षांपासून अनुकंपाची नोकर भर्ती बंद आहे. शिवाय पगार देण्यासाठी पैसेच नसल्याने उच्च न्यायालयातील ४३८ पदे रिक्त आहे. वेगळे विदर्भ राज्य झाले पाहिजे ही विदर्भातील नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला विदर्भ माझा, विदर्भ राज्य आघाडी, जनसुराज्य पार्टी व विदर्भ गण परिषदेने पाठींबा दिला आहे. या आंदोलनात विदर्भातील व्यापारी संघटनांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी वामनराव चटप यांनी केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार सरोज काशीकर, निळकंठ घवघवे, राम नवले, अभिजीत लाखे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, अरविंद राऊत, जि.प. सदस्य गजानन निकम आदींची उपस्थिती होती.