शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षरतेविषयी जागर, लोकसहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

नयी तालिम समितीच्या शांती भवनामध्ये जलसंपदा विभाग, जलसाक्षरता केंद्र, यशदा पुणे अंतर्गत राज्यस्तरीय जलसाक्षरता कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दिलीप कुलकर्णी, मोहन हिराबाई हिरालाल, यशदाचे कार्यकारी संचालक आनंद पुसावळे व डॉ. सुमंत पांडे उपस्थित होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । राजेंद्रसिंह राणा, सेवाग्राम येथे जलसाक्षरता कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : भूमीचे आरोग्य बिघडल्याने जल संचयाची गरज आहे. यासाठी नदीपासून तर गावातील छोट्या तलावात जलसंग्रह कसा करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशात महाराष्ट्र यावर काम करणारे पहिले राज्य ठरले आहे. मात्र, समस्या कमी झालेल्या नाहीत. भविष्यातील गरज व समस्या लक्षात घेता जलसाक्षरता आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.नयी तालिम समितीच्या शांती भवनामध्ये जलसंपदा विभाग, जलसाक्षरता केंद्र, यशदा पुणे अंतर्गत राज्यस्तरीय जलसाक्षरता कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दिलीप कुलकर्णी, मोहन हिराबाई हिरालाल, यशदाचे कार्यकारी संचालक आनंद पुसावळे व डॉ. सुमंत पांडे उपस्थित होते.बापू,माँ-बाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन आणि जलपूजन करण्यात आल्यानंतर गंगा की अविरता की मांग पुरी नहीं हुई व आपले आदर्श गाव या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.राजेंद्रसिंह म्हणाले, ज्या महाराष्ट्रात जलसाक्षरतेवर काम झाले, त्याच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत, हे विचार करण्यासारखे आहे. पाण्यावर कुणाची मालकी नाही. मानव, वने, असंख्य जीवजंतू या सर्वांचा अधिकार आहे. पण याचे खासगीकरण व व्यापार होत आहे. पाण्याचे आरोग्य बिघडविण्याचे काम मानवाने नाही तर बुद्धीने केले आहे. कारण बुद्धीच लोभीपणा निर्माण करते. या बुद्धीला अनुशासित केले पाहिजे. यासाठी आपल्याला जैवविविधतेकडे जावे लागेल. नागपूर येथे ब्यूरोलिया इंडिया या कंपनीने वॉटर सर्व्हिसच्या नावावर पाणी दिले. लोकसहभाग वाढवून काम करावे लागेल. अन्यथा येणारी पिढी पाण्यावर प्रश्न करेल. महाराष्ट्राला पाणीदार बनविण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न झाले पाहिजे, असे राजेंद्रसिंह म्हणाले.डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी जलसाक्षरता हा व्यापक विषय असून यातील केवळ पाणीच असा होत नाही तर याचा संबंध पर्यावरण, जल, जमीन आदींशीसुद्धा येतो. आकाशातून पडणारे पाणी जमिनीवर पडते. पाने, भूगर्भ यात सामावून जाते. तेव्हाच जलसाठा होत असतो. पण विखंडित विचार व कार्यप्रणालीमुळे पाणी संग्रहित झाले नाही. केवळ वारेमाप उपयोग केला. याचाच परिणाम भीषण समस्येत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.वन हे तो जल है,जल है तो कल है हा नारा देऊन सर्व काही सरकारने करावे, असे केंद्रित व्यवस्था झाली असल्याचे मोहन हिराबाई हिरालाल म्हणाले. संचालन वर्धा पाटबंधारे विभागच्या योगीता सोरते यांनी केले. कार्यशाळेत महाराष्ट्रातील १३५ प्रतिनिधी सहभागी. दुसऱ्या सत्रात ज्ञानेश्वर बोडखे, बारापात्रे, डॉ. सुमंत पांडे यांनी विचार मांडले.

टॅग्स :Waterपाणी