शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

सायंकाळ होताच सुरू होतो फटाक्यांचा बार; प्रदूषण सीमारेषेपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:36 IST

Wardha : पर्यावरणाची चिंता राहिली कुणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दिवाळीला होणारी आतषबाजी अन् त्यातून वाढते प्रदूषण हे समीकरणच झाले आहे वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सामाजिक संघटनांकडून जनजागृती केली जाते. मात्र, यंदा दिवाळी साजरी करताना शहरातील नागरिकांनी प्रदूषणाचे भान मात्र जपले नाही. त्याचा परिणाम म्हणून की काय, सायंकाळ होताच फटाक्यांचा बार फोडण्यात येत असल्याने प्रदूषण सीमारेषेपार जात असल्याचे वास्तव शहरात दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला हवा आणि ध्वनिप्रदूषण उच्चांकी स्तरावर पोहोचले होते. शहरात दिवाळीचा जल्लोष शिगेला पोहोचला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कानठळ्या बसविणाऱ्या  फटाक्यांबरोबरच धुराचे फटाकेदेखील मोठ्या प्रमाणात फोडले लक्ष्मीपूजनच्या रात्री सर्वत्र अखंडपणे फटाके फुटत होते. फटाक्यांची आतषबाजी मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या . प्रमाणात धूर सोडणाऱ्या फुलवाज्यासारख्या फटाक्यांमुळे हवेत धुराचे ढग तयार झाले होते. 

फटाक्यांच्या धुरातून श्वसनविकार बळावतात. विशेषतः आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या कालावधीत काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला होता; पण त्याची फिकीर कोणालाच दिसली नाही. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याने हवेत घातक वायूंचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत शहरात सर्वत्र धूरकट हवा होती. बहुतेक जणांनी इमारतीच्या आवारातच फटाके फोडले. फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यास जागा नसल्याने तेथील हवेचे प्रदूषण तुलनेने जास्तच राहिले, घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणातही विषारी हवा दीर्घकाळ राहिली. 

या घातक वायूंची भरफटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑ क्साइड आणि नायट्रेसची हवेत भर पडली. सायंकाळच्या आतष- बाजीमुळे ते रात्रभर धूलिकणांच्या स्वरुपात हवेत राहिले.

सकाळही होतेय प्रदूषणाचीच आतषबाजीनंतर उरलेल्या फटाक्यांचे वेस्टण सकाळी गोळा करून ठिकठिकाणी त्यांना आग लावून दिल्याचे दिसून आले. यात काही जळालेले तर काही अर्धज- ळालेल्या फटाक्यांचा समावेश असल्याने पेटविलेल्या कचऱ्यातून प्रदूषण होत आहे. हा प्रकार गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू आहे.

फटाक्यांमुळे जखमींची रीघ दिवाळीत फटाके उडविताना जखमी झालेल्यांनी रुग्णालयात रीघ लावल्याचे पाहायला मिळाले, सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात जखमींनी उपचार घेतले. यामध्ये मुलांची संख्या अधिक होती.

टॅग्स :fire crackerफटाकेpollutionप्रदूषणwardha-acवर्धा