शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळ होताच सुरू होतो फटाक्यांचा बार; प्रदूषण सीमारेषेपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:36 IST

Wardha : पर्यावरणाची चिंता राहिली कुणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दिवाळीला होणारी आतषबाजी अन् त्यातून वाढते प्रदूषण हे समीकरणच झाले आहे वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सामाजिक संघटनांकडून जनजागृती केली जाते. मात्र, यंदा दिवाळी साजरी करताना शहरातील नागरिकांनी प्रदूषणाचे भान मात्र जपले नाही. त्याचा परिणाम म्हणून की काय, सायंकाळ होताच फटाक्यांचा बार फोडण्यात येत असल्याने प्रदूषण सीमारेषेपार जात असल्याचे वास्तव शहरात दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला हवा आणि ध्वनिप्रदूषण उच्चांकी स्तरावर पोहोचले होते. शहरात दिवाळीचा जल्लोष शिगेला पोहोचला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कानठळ्या बसविणाऱ्या  फटाक्यांबरोबरच धुराचे फटाकेदेखील मोठ्या प्रमाणात फोडले लक्ष्मीपूजनच्या रात्री सर्वत्र अखंडपणे फटाके फुटत होते. फटाक्यांची आतषबाजी मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या . प्रमाणात धूर सोडणाऱ्या फुलवाज्यासारख्या फटाक्यांमुळे हवेत धुराचे ढग तयार झाले होते. 

फटाक्यांच्या धुरातून श्वसनविकार बळावतात. विशेषतः आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या कालावधीत काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला होता; पण त्याची फिकीर कोणालाच दिसली नाही. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याने हवेत घातक वायूंचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत शहरात सर्वत्र धूरकट हवा होती. बहुतेक जणांनी इमारतीच्या आवारातच फटाके फोडले. फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यास जागा नसल्याने तेथील हवेचे प्रदूषण तुलनेने जास्तच राहिले, घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणातही विषारी हवा दीर्घकाळ राहिली. 

या घातक वायूंची भरफटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑ क्साइड आणि नायट्रेसची हवेत भर पडली. सायंकाळच्या आतष- बाजीमुळे ते रात्रभर धूलिकणांच्या स्वरुपात हवेत राहिले.

सकाळही होतेय प्रदूषणाचीच आतषबाजीनंतर उरलेल्या फटाक्यांचे वेस्टण सकाळी गोळा करून ठिकठिकाणी त्यांना आग लावून दिल्याचे दिसून आले. यात काही जळालेले तर काही अर्धज- ळालेल्या फटाक्यांचा समावेश असल्याने पेटविलेल्या कचऱ्यातून प्रदूषण होत आहे. हा प्रकार गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू आहे.

फटाक्यांमुळे जखमींची रीघ दिवाळीत फटाके उडविताना जखमी झालेल्यांनी रुग्णालयात रीघ लावल्याचे पाहायला मिळाले, सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात जखमींनी उपचार घेतले. यामध्ये मुलांची संख्या अधिक होती.

टॅग्स :fire crackerफटाकेpollutionप्रदूषणwardha-acवर्धा