शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

सायंकाळ होताच सुरू होतो फटाक्यांचा बार; प्रदूषण सीमारेषेपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:36 IST

Wardha : पर्यावरणाची चिंता राहिली कुणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दिवाळीला होणारी आतषबाजी अन् त्यातून वाढते प्रदूषण हे समीकरणच झाले आहे वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सामाजिक संघटनांकडून जनजागृती केली जाते. मात्र, यंदा दिवाळी साजरी करताना शहरातील नागरिकांनी प्रदूषणाचे भान मात्र जपले नाही. त्याचा परिणाम म्हणून की काय, सायंकाळ होताच फटाक्यांचा बार फोडण्यात येत असल्याने प्रदूषण सीमारेषेपार जात असल्याचे वास्तव शहरात दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला हवा आणि ध्वनिप्रदूषण उच्चांकी स्तरावर पोहोचले होते. शहरात दिवाळीचा जल्लोष शिगेला पोहोचला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कानठळ्या बसविणाऱ्या  फटाक्यांबरोबरच धुराचे फटाकेदेखील मोठ्या प्रमाणात फोडले लक्ष्मीपूजनच्या रात्री सर्वत्र अखंडपणे फटाके फुटत होते. फटाक्यांची आतषबाजी मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या . प्रमाणात धूर सोडणाऱ्या फुलवाज्यासारख्या फटाक्यांमुळे हवेत धुराचे ढग तयार झाले होते. 

फटाक्यांच्या धुरातून श्वसनविकार बळावतात. विशेषतः आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या कालावधीत काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला होता; पण त्याची फिकीर कोणालाच दिसली नाही. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याने हवेत घातक वायूंचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत शहरात सर्वत्र धूरकट हवा होती. बहुतेक जणांनी इमारतीच्या आवारातच फटाके फोडले. फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यास जागा नसल्याने तेथील हवेचे प्रदूषण तुलनेने जास्तच राहिले, घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणातही विषारी हवा दीर्घकाळ राहिली. 

या घातक वायूंची भरफटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑ क्साइड आणि नायट्रेसची हवेत भर पडली. सायंकाळच्या आतष- बाजीमुळे ते रात्रभर धूलिकणांच्या स्वरुपात हवेत राहिले.

सकाळही होतेय प्रदूषणाचीच आतषबाजीनंतर उरलेल्या फटाक्यांचे वेस्टण सकाळी गोळा करून ठिकठिकाणी त्यांना आग लावून दिल्याचे दिसून आले. यात काही जळालेले तर काही अर्धज- ळालेल्या फटाक्यांचा समावेश असल्याने पेटविलेल्या कचऱ्यातून प्रदूषण होत आहे. हा प्रकार गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू आहे.

फटाक्यांमुळे जखमींची रीघ दिवाळीत फटाके उडविताना जखमी झालेल्यांनी रुग्णालयात रीघ लावल्याचे पाहायला मिळाले, सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात जखमींनी उपचार घेतले. यामध्ये मुलांची संख्या अधिक होती.

टॅग्स :fire crackerफटाकेpollutionप्रदूषणwardha-acवर्धा