शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

१,१०८ गावात कृत्रिम पाणी टंचाईचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:10 AM

उन्हाळा येताच पाणी टंचाई डोके वर काढण्याचा प्रकार नित्याचाच आहे. यावर प्रशासनाच्यावतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे३.५४ कोटींच्या थकबाकीपोटी कापणार वीज

ऑनलाईन लोकमतवर्धा : उन्हाळा येताच पाणी टंचाई डोके वर काढण्याचा प्रकार नित्याचाच आहे. यावर प्रशासनाच्यावतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने झालेल्या दुर्लक्षामुळे तब्बल १,१०८ गावांतील पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा धोक्यात आला आहे. मार्च अखेरीपर्यंत जर या गावांतील पाणी पुरवठा योजनांकडे थकीत असलेल्या देयकाचा भरणा झाला नाही तर त्यांची वीज कापण्याची तयारी महावितरणच्यावतीने करण्यात आली आहे. यामुळे या गावांत कृत्रिम पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात असलेल्या विविध ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकडे फेब्रुवारी अखेरपर्यंत ३ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपयांची थकबाबी असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. त्यांना या देयकाचा भरणा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च देण्यात आली आहे. या दिवसापर्यंत जर ही थकबाकी ग्रामपंचायतींकडून भरण्यात आली नाही तर त्या गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागणार आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात निर्णय घेवून नागरिकांकरिता प्रस्तावित असलेली समस्या मार्गी काढण्याकरिता वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे.यापूर्वी थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल २५ पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. या ग्रामपंचायतींवर २७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. या ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या देयकाचा भरणा केला नसल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे या गावातील नागरिकांना दोर बादली घेवून विहिरीवर आणि काहींना जाम झालेल्या हातपंपावर यावे लागले. नागरिकांच्या सुविधेकरिता ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी तत्काळ भरण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात एकूण थकबाकी २६.५७ कोटी रुपयेमहावितरणच्यावतीने जिल्ह्यातील विविध ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. यात पाणी पुरवठ्यासह शासकीय कार्यालये, पथदिवे, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. यापैकी तब्बल ३ लाख ७ हजार ९९७ ग्राहकांकडे एकूण २६ कोटी ५७ लाख ८१ हजार रुपये थकले आहेत. यात सर्वाधिक थकबाकी सार्वजनिक पथदिव्यांची आहे. जिल्ह्यात १४३९ ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख ७९ हजार रुपये थकले आहेत. तर २ लाख ८१ हजार १२ घरगुती ग्राहकांकडे २ कोटी रुपये थकले आहेत. कृषी पंपांची थकबाकी २ लाख ६२ हजार रुपयांवर आहे. तर १८ हजार ३६७ व्यावसायिक ग्राहकांकडे ९३ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त इतर ग्राहकांवरही मोठी थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत देयकाचा भरणा करण्याच्या सूचना महावितरणने केल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी