शहरं
Join us  
Trending Stories
1
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
2
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
3
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
4
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
5
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
6
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
7
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
8
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
9
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
10
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
11
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
12
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
13
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
14
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
16
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
17
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
18
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
19
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
20
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीत भरउन्हात कृत्रिम पाणी टंचाई

By admin | Updated: April 19, 2016 05:49 IST

पिपरी (मेघे) येथील जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणीपुरवठा केल्या

वर्धा : पिपरी (मेघे) येथील जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणीपुरवठा केल्या जातो. पिपरी येथील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी लिक झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने येथील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आजपर्यंत जमा असलेले पाणी नागरिकांना पुरविण्यात आल्याची माहिती आहे.
शहरालगतच्या ११ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. योजनेत येळाकेळी येथील धाम नदीतून पाणीसाठा घेतला जातो. या योनजेचे जलकुं भ पिपरी (मेघे) येथील टेकडीवर आहे. येळाकेळी येथून या जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी ५५० एमएमची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली; मात्र ही जलवाहिनी सतत लिक होत असल्याने लिकेज दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद केल्या जातो. यापूर्वी जलवाहिनीचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद केल्याचे प्रकार घडले आहे. मात्र आता उन्हाळा असल्याने पाणीटंचाईची झळ बसत आहे. शिवाय पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची कोणतीच सूचना नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांनी अतिरिक्त साठाही करून ठेवलेला नाही. परिणामी वापरण्यासाठी देखील पाणी शिल्लक नाही. यापैकी काहींकडे बोअरवेल असल्याने त्यांना पाण्याकरिता भटकावे लागत नसले तरी नळाच्या आधारावर नळाचेच पाणी आहे त्या नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ फिरावे लागत आहे. पिपरी (मेघे) परिसरातील काही नागरी वस्तींवर भर उन्हात नागरिक पाण्याकरिता वणवण करीत असल्याचे दिसून आले.(स्थानिक प्रतिनिधी)

ओम कॉलनीत चार दिवसांपासून नळ कोरडे
४आलोडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ओम कॉलनी व परिसरातील गत चार दिवसांपासून नळ आलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी इरतत्र भटकावे लागत आहे. घरी साठवणूक करून असलेले पाणी संपल्याने पिण्याचे पाणीही आता घरात शिल्लक नाही.

पाणी पुरवठा बंदबाबत कुुठलीही सूचना नाही
४पाईपलाईन दुरूस्तीच्या कामाकरिता पिपरी (मेघे) सह परिसरातील १० गावांचा पाणीपुरवठा बंद केल्या जातो; मात्र जीवन प्राधिकरणकडून नागरिकांना याबाबत कोणतीच सूचना दिली जात नाही. या योजनेची देखरेख व व्यवस्थापनाची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे आहे; मात्र यंत्रणेकडून सूचना देण्याविषयी आजवर कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. परिणामी दोन-तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास येथील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते.

जलवाहिनी होते सतत लिक
४मुख्य जलवाहिनीची जाडी ५५० एमएम आहे. या पाण्याचा दाब यापेक्षा अधिक असल्याने ही जलवाहिनी वारंवार लिक होत असल्याचे कळते. शिवाय जलवाहिनीचे काम करताना लावलेले जॉईन्ट वारंवार तुटत असल्याने येथूनही पाणी प्रवाहित होतो आणि पाण्याचा अपव्यय होतो. योजनेच्या प्रारंभी नळधारकांची संख्या अल्प होती. मात्र दिवसेंदिवस नळधारकांची संख्या वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे अधिक पाणीसाठा करावा लागतो. प्रत्यक्षात या मुख्य जलवाहिनीची क्षमता कमी असल्याने यात तांत्रिक बिघाड येत असल्याचे संबंधितांनी सांगितले.

सदोष जलवाहिन्यांमुळे पुलगावच्या काही भागात पाणी टंचाई
४ पुलगाव - उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहचला आहे. तापमानामुळे तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडलेले आहेत. अप्पर व लोअर वर्धा धरणातील पाण्याचा साठाही कमी झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होणे स्वाभाविकच आहे. येथे मात्र चार दशकापुर्वी टाकण्यात आालेल्या सदोष जलवाहिनीमुळे शहरात काही भागात पाणी टंचाईची झळ पोहचत आहे. या प्रश्नावर कायम स्वरूपी उपाय म्हणून वर्धा नदीवर बांधण्यात येत असलेले पुलगाव बॅरेज रखडल्याने ही समस्या काम राहणार असल्याचे दिसून येत आहे.