शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अलिखित संदर्भ साधनात पुरातत्त्वशास्त्राचे योगदान महत्त्वपूर्ण

By admin | Updated: September 29, 2014 00:50 IST

अलिखित संदर्भ साधनातील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पुरातत्त्वशास्त्र होय. जगातील अज्ञात इतिहास जगासमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य पुरातत्त्वशास्त्राच्या माध्यमातून होते.

वर्धा : अलिखित संदर्भ साधनातील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पुरातत्त्वशास्त्र होय. जगातील अज्ञात इतिहास जगासमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य पुरातत्त्वशास्त्राच्या माध्यमातून होते. यात उत्खननाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधू संस्कृतीचे उदाहरण आहे. आधुनिक इतिहास जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून पुरातत्त्वशास्त्र उदयास आले म्हणून इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, असे मत रा.तु.म. नागपूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी व्यक्त केले.यशवंत महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय, येथील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रा. डॉ. विरेंद्र बैस, प्रा. नरेश कवाडे, प्रा. तेलंग, प्रा. प्रवीण भगत उपस्थित होते.यानंतर बोलताना मार्गदर्शकांनी आधुनिक भारताच्या इतिहासात पुरातत्त्वशास्त्राने मोलाची भर टाकली आहे. यामुळेच इतिहास विषयाची व्याप्ती वाढली आहे. विभागप्रमुख प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास पुरातत्त्वशास्त्रातून करण्यात येतो. सामान्याचे आयुष्य व मानवतेची कहानी हा इतिहासाचा आत्मा आहे. आजवरच्या वाटचालीस इतिहासच जबाबदार आहे. हे इतिहास विषयाचे महत्त्व आहे. आज अस्तित्वात असणाऱ्या शास्त्रामध्ये असे कोणतेच शास्त्र नाही की ज्याच्या मुळाशी इतिहास नाही. त्यामुळे इतिहासातील नोंदी आवश्यक असून त्या अचूक करण्यासाठी पुरातत्त्वशास्त्र उपयुक्त आहे, असे सांगितले.याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा. डॉ. महेशकर यांचा डॉ. विलास देशमुख यांच्या हस्ते सूतमाला देऊन सत्कार करण्यात आला. यासह उन्हाळी २०१४ एम.ए. इतिहास परीक्षेत ‘ओ’ ग्रेड प्राप्त करणाऱ्या आरती भिरखेडे, नाजुका तिमांडे, सचिन नगराळे, तुषार लांडे या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते भेटवस्तू आणि संविधानाची उद्देश पत्रिका देऊन सन्मानित करण्यात आले.यानंतर उदबोधन करताना डॉ. विलास देशमुख यांनी इतिहास संशोधकांनी ते शिल्प कोणाच्या काळात निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले यापेक्षा त्या कलाकृतीच्या निर्मितीमागील भावना विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी असे आवाहन केले. यानंतर इतिहास मंडळ अध्यक्ष मोनाली भोयर यांनी वर्षभर झालेल्या कार्यक्रमाचे अहवालवाचन केले. कार्यक्रमाचे संचालन पुनम भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री हेटे हिने केले. कार्यक्रमाला प्रा. बेले, प्रा. नारायणे, प्रा. लोहकरे, प्रा. भालेकर आदींची उपस्थिती होती. आयोजनाला सुहास इंगळे, प्रतिक लोहकरे, सागर वानखेडे, रोहित गिरी, पल्लवी आडकिने, प्रांजली माटे, अनुश्री तडस, दीपाली वाघमारे, प्राजक्ता पाटील, पल्लवी शेंडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)