शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटींचा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ठेवावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे । आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा नवीन कार्यक्रम आला आहे. जिल्ह्यात झालेल्या १ हजार ७६ कि.मी. मधील जुन्या आणि खराब रस्त्यांचे आराखडे खासदार आणि आमदार यांच्या मान्यतेने तयार करून मंजुरीसाठी पाठवावेत. जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटींपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर आदींची उपस्थिती होती.जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ठेवावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अनेक गावांत बस जात नाही आणि त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी असणाऱ्या पांदण रस्त्यांचा विषय आमदार डॉ. पंकज भोयर पालकमंत्री पांदण रस्ते समितीसमोर ठेवला. त्यावर समितीने या आराखड्यास मंजुरी दिली. तसेच यासाठी १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे ना. बावनकुळे यांनी सांगितले. सोबतच पुढील १५ दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रस्ते दुरुस्त करावेत, असे निर्देश बावनकुळे यांनी बांधकाम विभागाला दिलेत.जिल्हा परिषद व नगर परिषदेअंतर्गत झालेल्या पाच वर्षांतील कामांचे परीक्षण करण्यासाठी चमू पाठविण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, धरणांची पाणी पातळी, पुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेली मनुष्यहानी, घर, जनावरे आदींचे नुकसान आणि दिलेले आर्थिक सहाय्य याबाबत माहिती दिली. शिवाय यावर्षी खरिपाच्या लागवड क्षेत्रात १६ हजार हेक्टरने वाढ झाल्याचेही सांगितले. यात बैठकीला जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे