शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भाजीपाला पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:00 AM

पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते.

ठळक मुद्देमातीमोल भाव : शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाचे भाव पडल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी पिकात चक्क जनावरे सोडली. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे.जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील चिकणी (जामणी), पढेगाव, वर्धा तालुक्यातील चितोडा, बरबडी, सेवाग्राम, सेलू काटे, पवनार, तिगाव व अन्य भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकाची लागवड करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला. पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते. त्यामुळे भाजीपाल्याला फारशी मागणी नसल्याने भाव पडले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना १५ किलोची भाजीपाल्याची कॅरीबॅग १० रुपये इतक्या कवडीमोल भावात विकावी लागली. यात लागवडीचा दूर वाहतुकीचाही खर्च निघणे अवघड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी एक ते पाच एकरात लागवड केलेल्या भाजीपाला पिकांत चक्क जनावरे सोडली.दलालांनीही खरेदीकडे फिरविली पाठभाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. मात्र, भावच नसल्याने दलालांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली. स्वत:च्या जबाबदारीवर भाजीपाला विक्रीसाठी आणा, असे दलालांकडून सांगणत आले. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची थेट ग्राहकांनाच विक्री केली.फळपिकालाही कवडीमोल भावजिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कलिंगड, डांगर आदी हंगामी फळपिकांची लागवड करतात. मात्र, कलिंगड, डांगर या फळपिकांनाही पाच ते सहा रुपये किलो इतका कवडीमोल भाव असल्याने अनेक फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिकाची थेट ग्राहकांना विक्री केली. तर भावच नसल्याने तोडणीअभावी अनेकांचे फळपीक शेतातच सडत राहिले.चरितार्थासाठी स्वीकारला भाजी विक्री व्यवसायकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे लघु व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. शहरातील अनेक ऑटोरिक्षा चालक, कापड व इलेक्ट्रॉनिक्स, भांडी दुकानात रोजंदारीने नोकरी करणारे तरुण, चहा टपरीचालक, पानटपरी व्यावसायिक, अंडी, पाणीपुरी विक्रेते आदींनी चक्क भाजी आणि फळ विक्रीचा अस्थायी व्यवसाय स्वीकारला. शहरात अनेक रस्त्याच्या कडेला हातमाडीच्या माध्यमातून हे व्यावसायिक भाजीपाला, फळविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती