शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:29 IST

रीतसर परवानगीने होत आहे सभेचे आयोजन

वर्धा : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध महाविकास आघाडीने राज्यभरात सहा ‘वज्रमूठ सभा’ घेण्याचे नियोजन केले आहे. नुकतीच संभाजीनगरमध्ये झालेली पहिलीच विराट सभा पाहून भारतीय जनता पार्टीने धसका घेतला आहे. म्हणूनच नागपुरातील सभेला विरोध करण्याचा खटाटोप चालविला आहे; परंतु, सर्व परवानगीनिशी या सभेचे आयोजन होत असून ती यशस्वीही होईल, असा विश्वास माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या नियोजनासंदर्भात ते वर्ध्यात आले होते. त्यांनी वर्ध्यातील शिववैभव सभागृहात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सभेकरिता वर्ध्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील, या अनुषंगाने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता सदस्य नोंदणी आणि बुथ कमिटी तयार करण्यासंदर्भातही आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, माजीमंत्री सुबोध मोहिते आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मंत्रिमंडळ अयोध्येत

राज्यामध्ये काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थितीची पाहणी करणे आवश्यक असताना, या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्याचं मंत्रिमंडळ अयोध्येला रवाना झाले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती जिव्हाळा आहे, हे लक्षात येते. या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम केले. आता तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर हाेणाऱ्या अहवालावर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आ. अनिल देशमुख यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा