शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:29 IST

रीतसर परवानगीने होत आहे सभेचे आयोजन

वर्धा : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध महाविकास आघाडीने राज्यभरात सहा ‘वज्रमूठ सभा’ घेण्याचे नियोजन केले आहे. नुकतीच संभाजीनगरमध्ये झालेली पहिलीच विराट सभा पाहून भारतीय जनता पार्टीने धसका घेतला आहे. म्हणूनच नागपुरातील सभेला विरोध करण्याचा खटाटोप चालविला आहे; परंतु, सर्व परवानगीनिशी या सभेचे आयोजन होत असून ती यशस्वीही होईल, असा विश्वास माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या नियोजनासंदर्भात ते वर्ध्यात आले होते. त्यांनी वर्ध्यातील शिववैभव सभागृहात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सभेकरिता वर्ध्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील, या अनुषंगाने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता सदस्य नोंदणी आणि बुथ कमिटी तयार करण्यासंदर्भातही आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, माजीमंत्री सुबोध मोहिते आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मंत्रिमंडळ अयोध्येत

राज्यामध्ये काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थितीची पाहणी करणे आवश्यक असताना, या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्याचं मंत्रिमंडळ अयोध्येला रवाना झाले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती जिव्हाळा आहे, हे लक्षात येते. या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम केले. आता तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर हाेणाऱ्या अहवालावर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आ. अनिल देशमुख यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा