शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तातडीने नुकसानभरपाई द्या - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2022 18:23 IST

नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पत्रकार परिषदेत दिली माहिती

वर्धा : सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. घरांसह गोठ्याची पडझड झाली असून जनावरांचीही हानी झाली आहे. शेतीकामेही ठप्प पडली असून, रोजगार हिरावल्याने अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसांमागून दिवस लोटत असूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता विरोधी पक्षनेते अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरीप हंगाम हातातून गेला असून आता दुबार पेरणीकरिता हरभरा व अर्ली तुरीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून वाहतूक प्रभावित झाली आहे. यासोबतच कापूस आणि सोयाबीनच्या पिकांची वाढ खुंटली असून उत्पन्नाची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पर्याय देण्याकरिता चारही कृषी विद्यापीठ, कृषी आयुक्त व कृषी सचिवांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सोबत अनेकांच्या शेतातील विहिरी खचल्या, वाहून गेल्या त्यामुळे याची दुरुस्ती मनरेगातून करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली.

शासनाला बिजोत्पादन कार्यक्रम राबवावा लागेल

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील शेतकरी पिकविलेल्या सोयाबीनमधूनच बियाणाचीही व्यवस्था करतात. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे पीक गेल्याने पुढील हंगामात सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शासनाला तातडीने सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबवावा लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन उपलब्ध करून देणे, आवश्यक असल्याचेही आ.पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वच जबाबदारी सरकारवर ढकलून चालणार नाही. कारण आम्हीही सरकारमध्ये होतो. त्यामुळे या आपत्तीकाळात सामाजिक संस्था, कंपन्यांचा सीएसआर फंड आदीचाही वापर करावा. यासोबतच जिल्हा खनिज निधीचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा अधिकार पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना आहे. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत पूरवावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली.

नवख्यांना खुर्ची, ज्येष्ठांचे स्टॅण्डअप

विरोधी पक्षनेते आमदार अजित पवार यांच्या विश्रामगृहातील पत्रपरिषदेदरम्यान नियोजनाचा अभाव दिसून आला. पत्रपरिषदेच्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने ही पत्रपरिषद की कार्यकर्ता मेळावा, असा प्रश्न निर्माण झाला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पत्रकारांनाही उभे राहूनच वृत्तसंकलन करावे लागले. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेतही काहींना डावलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आहे. ज्यांनी पक्षवाढीकरिता आतापर्यंत प्रयत्न केले आणि करीत आहेत त्यांना उभे राहावे लागते तर जे नव्याने पक्षात दाखल झाले त्यांना खुर्ची देण्यात आली. त्यामुळे पक्षाच्या हिताकरिता असे वागणे बरे नाही, अशी चर्चा रंगली होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारfloodपूरwardha-acवर्धाVidarbhaविदर्भFarmerशेतकरी