शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

पीक पाहणीसाठी कृषी अधिकारी बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:51 IST

परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांशी संवाद : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी सुचविले उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यानंतर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधून उपाययोजनाही सुचविल्या.नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावरकर यांच्या पाच एकरातील सोयाबीन पिकांवर लष्करी अळीने हल्ला चढवून पीक नष्ट केले. याची तक्रार केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी विद्या मानकर यांनी दखल घेत लगेच युवराज सावरकर यांचे शेत गाठून पाहणी केली. यावेळी सोयाबीन पिकावर उंट व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आला. या दोन्ही अळ्यांनी या सोयाबीन पिकांचे पुर्णत: नुकसान केल्याचे दिसून आले.लष्करीअळीच्याा उत्पत्तीने शेतकरी हैराणलष्करी अळीचे जीवनचक्र ३०-३५ दिवसाचे असून या अळीचा एक पतंग एका वेळी ५०० अंडी टाकु शकतो.लष्करी अळी ही झाडाचे खालची पाने खाण्यापासून सुरुवात करते, ज्यातुन ४-५ दिवसात अळ्या बाहेर येतात. ही अळी दिवसभर जमिनीवर असते तर रात्री नुकसान करण्यास सुरुवात करते. त्यामुळे फवारणीचा परिणाम होत नाही.जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले सोयाबीनचे पीकसमुद्रपूर तालुक्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्यातील अधिकाºयांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विद्या मानकरही उपस्थित होत्या. यावेळी नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावकर यांनी लष्करी अळीने फस्त केलेले सोयाबीनचे काही झाडे उपडून आणून जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन लगेच अधिकारी सावकर यांच्या शेतात पोहोचले.त्यावरील उपाययोजनासोयाबीनचे पीक फुलावर येण्यापुर्वी ३-४ अळ्या प्रतिमीटर ओळीत आढळल्यास क्विनालफॉस २५ टक्के २० मि.ली. किवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के १५ ग्रँम किवा प्रोफेनोफॉस ५० टक्के २५ मि.ली, किवा स्पिनोसँड ४५ एस.पि.४ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किवा इंडोक्साकार्ब १५.८ एस.सी.हे औषध ६.६ मिली १० लिटर पाण्यात मिळुन फवारणी करावे. शेताच्या सभोवताल तण असल्यास ते काढुन टाकावे.लष्करी अळीच्या नियंत्रणाकरीता अवाजवी व महागडे औषध वापरण्याची गरज नाही. असे कृषि अधीक्षक मानकर यांनी सांगितले. सोबतच घरगुती तयार होणाºया अळीनाशक औषधाचे मिश्रण तयार करण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी