शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पीक पाहणीसाठी कृषी अधिकारी बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:51 IST

परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांशी संवाद : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी सुचविले उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यानंतर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधून उपाययोजनाही सुचविल्या.नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावरकर यांच्या पाच एकरातील सोयाबीन पिकांवर लष्करी अळीने हल्ला चढवून पीक नष्ट केले. याची तक्रार केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी विद्या मानकर यांनी दखल घेत लगेच युवराज सावरकर यांचे शेत गाठून पाहणी केली. यावेळी सोयाबीन पिकावर उंट व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आला. या दोन्ही अळ्यांनी या सोयाबीन पिकांचे पुर्णत: नुकसान केल्याचे दिसून आले.लष्करीअळीच्याा उत्पत्तीने शेतकरी हैराणलष्करी अळीचे जीवनचक्र ३०-३५ दिवसाचे असून या अळीचा एक पतंग एका वेळी ५०० अंडी टाकु शकतो.लष्करी अळी ही झाडाचे खालची पाने खाण्यापासून सुरुवात करते, ज्यातुन ४-५ दिवसात अळ्या बाहेर येतात. ही अळी दिवसभर जमिनीवर असते तर रात्री नुकसान करण्यास सुरुवात करते. त्यामुळे फवारणीचा परिणाम होत नाही.जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले सोयाबीनचे पीकसमुद्रपूर तालुक्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्यातील अधिकाºयांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विद्या मानकरही उपस्थित होत्या. यावेळी नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावकर यांनी लष्करी अळीने फस्त केलेले सोयाबीनचे काही झाडे उपडून आणून जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन लगेच अधिकारी सावकर यांच्या शेतात पोहोचले.त्यावरील उपाययोजनासोयाबीनचे पीक फुलावर येण्यापुर्वी ३-४ अळ्या प्रतिमीटर ओळीत आढळल्यास क्विनालफॉस २५ टक्के २० मि.ली. किवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के १५ ग्रँम किवा प्रोफेनोफॉस ५० टक्के २५ मि.ली, किवा स्पिनोसँड ४५ एस.पि.४ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किवा इंडोक्साकार्ब १५.८ एस.सी.हे औषध ६.६ मिली १० लिटर पाण्यात मिळुन फवारणी करावे. शेताच्या सभोवताल तण असल्यास ते काढुन टाकावे.लष्करी अळीच्या नियंत्रणाकरीता अवाजवी व महागडे औषध वापरण्याची गरज नाही. असे कृषि अधीक्षक मानकर यांनी सांगितले. सोबतच घरगुती तयार होणाºया अळीनाशक औषधाचे मिश्रण तयार करण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी