शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

पीक पाहणीसाठी कृषी अधिकारी बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:51 IST

परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांशी संवाद : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी सुचविले उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यानंतर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधून उपाययोजनाही सुचविल्या.नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावरकर यांच्या पाच एकरातील सोयाबीन पिकांवर लष्करी अळीने हल्ला चढवून पीक नष्ट केले. याची तक्रार केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी विद्या मानकर यांनी दखल घेत लगेच युवराज सावरकर यांचे शेत गाठून पाहणी केली. यावेळी सोयाबीन पिकावर उंट व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आला. या दोन्ही अळ्यांनी या सोयाबीन पिकांचे पुर्णत: नुकसान केल्याचे दिसून आले.लष्करीअळीच्याा उत्पत्तीने शेतकरी हैराणलष्करी अळीचे जीवनचक्र ३०-३५ दिवसाचे असून या अळीचा एक पतंग एका वेळी ५०० अंडी टाकु शकतो.लष्करी अळी ही झाडाचे खालची पाने खाण्यापासून सुरुवात करते, ज्यातुन ४-५ दिवसात अळ्या बाहेर येतात. ही अळी दिवसभर जमिनीवर असते तर रात्री नुकसान करण्यास सुरुवात करते. त्यामुळे फवारणीचा परिणाम होत नाही.जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले सोयाबीनचे पीकसमुद्रपूर तालुक्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्यातील अधिकाºयांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विद्या मानकरही उपस्थित होत्या. यावेळी नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावकर यांनी लष्करी अळीने फस्त केलेले सोयाबीनचे काही झाडे उपडून आणून जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन लगेच अधिकारी सावकर यांच्या शेतात पोहोचले.त्यावरील उपाययोजनासोयाबीनचे पीक फुलावर येण्यापुर्वी ३-४ अळ्या प्रतिमीटर ओळीत आढळल्यास क्विनालफॉस २५ टक्के २० मि.ली. किवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के १५ ग्रँम किवा प्रोफेनोफॉस ५० टक्के २५ मि.ली, किवा स्पिनोसँड ४५ एस.पि.४ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किवा इंडोक्साकार्ब १५.८ एस.सी.हे औषध ६.६ मिली १० लिटर पाण्यात मिळुन फवारणी करावे. शेताच्या सभोवताल तण असल्यास ते काढुन टाकावे.लष्करी अळीच्या नियंत्रणाकरीता अवाजवी व महागडे औषध वापरण्याची गरज नाही. असे कृषि अधीक्षक मानकर यांनी सांगितले. सोबतच घरगुती तयार होणाºया अळीनाशक औषधाचे मिश्रण तयार करण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी