शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दशकानंतरही पुलगाव तालुका नाहीच

By admin | Updated: July 7, 2014 23:44 IST

राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्या, येथे औद्योगिक वसाहत स्थापन करा, ही मागणी तीन दशकापासून शहरवासी करीत आहे़ शासन काही जिल्ह्याचे विभाजन

प्रभाकर शहाकार - पुलगावराजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्या, येथे औद्योगिक वसाहत स्थापन करा, ही मागणी तीन दशकापासून शहरवासी करीत आहे़ शासन काही जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे व काही तहसील निर्माण करीत आहे़ मग शासनाच्या लेखी आश्वासनानंतरही पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्यास शासन टाळटाळ करीत आहे. तीन दशकानंतरही पुलगाव तहसीलचा प्रश्न टांगणीवरच असल्यामुळे शहरवासी शासनकर्त्यांविरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे़१९७८ पासून पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्या, अशी जनतेची एकमुखी मागणी आहे. पण तीन दशकापासून शासन शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसत आहे़ मध्य रेल्वेच्या मुंबई हावडा रेल्वे मार्गावर वसलेल्या या शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती आणि हैदराबाद-भोपाल मार्ग जातात़ शहरालगतच बारमाही वाहणारी वर्धा नदी आहे़ आठ कनिष्ठ महाविद्यालये, १० माध्यमिक शाळा, बी़पी़एड़, फॉर्मसी, डी़एड़, बी़एड़ आठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, सात बँका, उपकोषागार, न्यायालय, नायब तहसीलदार कार्यालय, ग्रामीण रूग्णालय, नगर परिषद, परिवहन आगार, जयभारत टेक्सटाईल हा वस्त्रोद्योग, खत कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, केंद्रीय दारूगोळा भांडार, शासकीय धान्य गोदाम, नाचणगाव व गुंजखेडा ही शहरवजा गावे यासह सर्व बाबतीत सुविधाजनक असतानाही या शहरात औद्योगिक वसाहत व तहसीलचा दर्जा देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे़याबाबत वारंवार मागणी होत असल्यामुळे राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी पत्र क्ऱ ४८८८/१९२९/ प्रक़्ऱ२०७/म-१० ५ डिसेंबर १९८८ रोजी पाठविले. या पत्रानुसार शहर काँग्रेसला पुलगावला तहसीलचा दर्जा देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने या मागणीचा विचार पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील तालुक्याची पुनर्रचना करताना अवश्य करण्यात येईल़ तूर्त ही पुनर्रचना आर्थिक कारणास्तव स्थगीत ठेवण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र कक्ष अधिकारी म़ दे़ केदार यांच्या स्वाक्षरीने दिले होते़ परंतु शासनाला आपल्याच या आश्वासनाचा विसर पडल्याचे तीन दशकाहून ही मागणी पूर्ण न झाल्याने निदर्शनास येत आहे. या तीन दशकात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक तालुकाची पुनर्रचना करून अनेक नवीन तालुके निर्माण झाले़ मात्र लेखी आश्वासनानंतरही शासनाने पुलगावकरांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्याचा आरोप शहरवासी करीत आहे. सध्याही राज्य शासन ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्ह्याची, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात काही नवीन तालुक्यांची आणि गडचिरोली जिल्ह्यात चार नवीन तालुका निर्मिती करण्याच्या विचारात आहे़ परंतु पुलगावाला तालुका घोषित करण्याचा मात्र शासनाला विसर पडला़ या शहराला तालुक्याचा दर्जा न मिळाल्यामुळे सर्व सुविधा असतानाही औद्योगिक वसाहत नाही की कुठलाही मोठा उद्योग नाही़ उलट आलेला रेल्वे कोच कारखाना पंजाब राज्यात गेला आणि पुलगाव शहर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिले़तालुक्याच्या दर्जा अभावी या शहराला केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनापासून वंचित राहावे लागत आहे़ शासनाने कुठल्याही आंदोलनाची वाट न पाहता पुलगावकरांच्या या मागणीचा विचार करून या शहराला तहसीलचा दर्जा द्यावा, अशी मागणी शहरवासी करीत आहे.