शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नळाला विद्युतपंप लावणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:00 IST

पाणी टंचाई असल्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. अशातच आपल्याला जास्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिकांनी नळालाच विद्युतपंप लावले आहे. त्यामुळे इतरांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विद्युत पंप काढावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून नळजोडणी खंडित केली जाईल,

ठळक मुद्देनळाला विद्युतपंप लावणाऱ्यांवर होणार कारवाई

तपासणी पथकाची नियुक्ती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी टंचाई असल्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. अशातच आपल्याला जास्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिकांनी नळालाच विद्युतपंप लावले आहे. त्यामुळे इतरांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विद्युत पंप काढावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून नळजोडणी खंडित केली जाईल, अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने देण्यात आल्या आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या पिपरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व आर्वी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जातो. जलाशयाने तळ गाठल्याने काही दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा केल्यानंतर नळ सुरु असताना काही नागरिक नळाचे मीटर काढून विद्युतपंपाद्वारे पाणी घेतात. यामुळे इतर नळधारकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. याबाबत नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रार केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कर्मचारी नियुक्त केले आहे. नळग्राहकांनी तत्काळ नळाला लावलेले विद्युतपंप काढावे अन्यथा तपासणी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास विद्युतपंप जप्त करण्यासोबतच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच कोणतेही कारण न देता नळ जोडणी खंडित करण्यात येईल. सोबतच नळधारकांनी पाण्याचे थकीत असलेले देयक त्वरीत भरावे अन्यथा थकबाकी असणाºयांची नळजोडणी बंद करण्यात येईल, असेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई