चार नव्या रेल्वे मार्गांसाठी २१.६ हेक्टर जमीन अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:22+5:30

वर्धा-नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, वर्धा-नागपूर चौथा रेल्वे मार्ग, वर्धा -बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग तसेच वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कासवगतीने होत असल्याची ओरड होत असतानाच लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.

Acquired 21.6 hectares of land for four new railway lines | चार नव्या रेल्वे मार्गांसाठी २१.६ हेक्टर जमीन अधिग्रहित

चार नव्या रेल्वे मार्गांसाठी २१.६ हेक्टर जमीन अधिग्रहित

ठळक मुद्दे९३ व्यक्तींना मिळाला मोबदला : डिसेंबर अखेरपर्यंत होणार खरेदी प्रक्रिया

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर वाढलेला ताण तसेच नागरिकांची मागणी या गोष्टींना केंद्र स्थानी ठेऊन वर्धा-बल्लारशाह, वर्धा-नांदेड तसेच वर्धा-नागपूर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी सध्या जमीन अधिग्रहित केली जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असून आतापर्यंत ९३ शेतकऱ्यांची एकूण २१.६ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा-नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, वर्धा-नागपूर चौथा रेल्वे मार्ग, वर्धा -बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग तसेच वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कासवगतीने होत असल्याची ओरड होत असतानाच लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.
वर्धा-बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग वर्धा जिल्ह्यात सुमारे ४० किमीचा राहणार असून त्यासाठी आतापर्यंत ५० शेतकऱ्यांची १०.८१ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. तर वर्धा-नांदेड हा रेल्वे मार्ग वर्धा जिल्ह्यात ३३.४०० किमीचा राहणार असून त्यासाठी आतापर्यंत २३ शेतकऱ्यांची ७.८३ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.
तसेच वर्धा-नागपूर या तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी सात शेतकऱ्यांची १.६८ हेक्टर आणि वर्धा-नागपूर या चौथ्या रेल्वे मार्गासाठी १३ व्यक्तींची १.२८ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे.

मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण
या चारही नवीन रेल्वे मार्गांसाठी अधिग्रहित करावयाची असलेल्या सर्वच जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. याच मूल्यांकनाच्या आधारावर अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या मालकाला मोबदला दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

मार्च महिन्यात जमीन संपादनाच्या कामाला गती दिली जात होती; पण मार्च अखेरीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने या कामाला बे्रक लागला. मात्र आता नव्या जोमाने या कामाला गती दिली जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
- सुनील कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: Acquired 21.6 hectares of land for four new railway lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे