शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील 'व्हायरल सच'चा खटाटोप, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 6:45 PM

सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप हास्यकलाकार सुनील पाल यांनी केला आहे.

वर्धा: सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप हास्यकलाकार सुनील पाल यांनी केला आहे. तसेच याबाबतचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने आरोग्यक्षेत्रात चांगलाच हडकंप माजला. यासंदर्भात रुग्णालयाची बाजू मांडताना रुग्णालय प्रशासनानेही आता व्हिडीओ व्हायरल केल्याने सध्या सोशल मीडियावर आपली सत्य बाजू मांडण्याकरिता व्हायरल सचचा खटाटोप सुरू आहे.आचार्य विनोबा भावे रुग्णालयात नुकताच आठवडाभरापूर्वी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच ७ नोव्हेंबरच्या रात्री हास्यकलाकार सुनील पाल यांची बहीण शारदा पाल (रा .हिंगणघाट) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी सुनील पाल यांनी अतिदक्षता विभागात जाऊन रुग्णांवर प्रशिक्षित डॉक्टरकडून उपचार होत नाही. परिणामी प्रकृती खालावत असल्याचा आरोप करीत त्यासंदर्भातील व्हिडीओही व्हायरल केला. तसेच बहिणीवर उपचार होत नसल्याने तिला नागपूरला हलविले, परंतु तिचा मृत्यू झाला. सुनील पाल यांनी या घटनेला रुग्णालयातील डॉक्टर व प्रशासनालाच दोषी ठरविले आहे. या संदर्भात त्यांनी व्हिडीओही सोशल मीडियावर टाकले आहे. परंतु आता रुग्णालयानेही आपली बाजू मांडण्यासाठी व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सध्यातरी व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप होतांना दिसून येत आहे. पण, यात चूक नेमकी कोणाची, याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.-------------------------------------------------------------जशास तसे पण यातील सत्यता काय?सुनील पाल यांनी थेट रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवत व्हिडीओ व्हायरल केल्याने रुग्णालय प्र्रशासनानेही आपली बाजू मांडण्यासाठी व्हिडीओ व्हायरलचाच आधार घेतला आहे. पण, यातील सत्य काय? असा प्रश्न सा-यांनाच पडला आहे.रुग्णालय प्रशासनाकडून चार व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहे. यामध्ये दोन रुग्णांच्या नातेवाईकांचे असून त्या नातेवाईकांनी रुग्णांना मिळणा-या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. त्यातील एका मातेने येथील डॉक्टरांच्या उपचारामुळेच माझा मुलगा परत मिळाल्याचे सांगून नातेवाईकांनीही डॉक्टरांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. सोबतच पाल यांच्या व्हिडीओमधील डॉ. आदित्य भागवत यांचाही व्हिडीओ व्हायरल झाला असून ते एमडीचे विद्यार्थी आहेत. त्यांनी २०१६ मध्येच एमबीबीएस पूर्ण केल्याचे सांगितले. ते अतिदक्षता विभागातच कार्यरत असून पाल यांच्या गोंधळाने इतर गंभीर रुग्णांना त्याचा त्रास झाला असून एका सेलिब्रिटीचे असे वागणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.मेडिसिन विभागाचे प्रोफेसर डॉ. टी. के. कांबळे यांनी शारदा पाल या आठदिवसापासून आजारी होत्या. यवतमाळच्या रुग्णालयात त्यांच्या पोटाचा सिटीस्कॅन केल्यानंतर गंभीर आजार असल्याचे रिपोर्टमध्ये नमुद आहे.त्यानुसार उपचार सुरु करण्यात आले.परंतू त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. याबाबत नातेवाईकांनाही माहिती दिली होती, असे सांगितले आहे. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रशेखर महाकाळकर व विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी पाल यांचे आरोप चुकीचे ठरवित रुग्णाला सर्वोतोपरी मदत केली. त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णाला नागपूरला हलविण्यासाठीही रुग्णालयाच्या वतीने मदत करण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.