शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

दोन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 20:21 IST

Wardha News केळझर येथील दोन जिवलग मित्र दुचाकीने नागपूरवरून परत येत असताना आसोला (सावंगी) (जि. नागपूर) गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्दे दोघांच्या अंत्ययात्रेने समाजमन सुन्न

 

वर्धा : केळझर येथील दोन जिवलग मित्र दुचाकीने नागपूरवरून परत येत असताना आसोला (सावंगी) (जि. नागपूर) गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ९ मार्चला मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाला. गुरुवारी दोघांच्याही पार्थिवावर एकाचवेळी केळझर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगदीश सुनील साखरकर (२८), जयंत केशव मुजबैल (२६) असे मृत युवकांची नावे आहे. जगदीश साखरकर यांचा ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय आहे. वाहनांचे काही सुटे भाग आणण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास नागोसे नामक मित्राची एमएच-३२/एआर-८८५० क्रमांकाच्या दुचाकीने जयंत मुजबैले या मित्राला सोबत घेत जगदीश नागपूरला गेला होता. काम आटोपून गावाकडे परतीच्या प्रवासात उशिरा रात्री नागपूर जिल्ह्यातील आसोला (सावंगी) गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोन्ही जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती केळझर गावात पसरताच गावात शोकाकुल वातावरण होते.

मृतक जगदीश साखरकर याच्या पश्चात आई आहे. तो एकमेव आधार होता; तर जयंत मुजबैले हा देखील एकुलता एक होता. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. दुपारी एकाचवेळी दोघांचीही अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी झाला होता.

‘त्या’ घटनेचा उजाळा अन् डोळे पाणावले

अपघातात एकाच वेळी दोन युवकांचा जीव जाण्याची ही दुसरी घटना आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी केळझर गावातील काही तरुण दुचाकीने महाशिवरात्रीला पचमढी येथे महादेवाच्या दर्शनाला गेले होते. एका दुचाकीचा अपघात झाला होता त्यात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला होता. पुन्हा तशीच घटना घडल्याने पाणावलेल्या डोळ्यांनी त्या घटनेची आठवण झाल्याची चर्चा गावकऱ्यांकडून ऐकावयास मिळाली.

टॅग्स :Accidentअपघात