शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

ठंडा है पर गंदा है; पाच रुपयांची पाणी बाटली २० रुपयांमध्ये! विनापरवानगी सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 17:52 IST

बोरमधील पाणी केवळ थंड करून विकले जात आहे. ते पाणी आरोग्यास खूप घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, हे तपासण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देवर्ध्यात अनेक कंपन्यांचा गोरखधंदा

वर्धा : शहरात जीवन प्राधिकरणमार्फत पाणीपुरवठा होत आहे. सध्या पिण्याचे पाणी विकत घेण्याचे ‘फॅड’ वाढले. मात्र, विकत घेऊन मिळणारे पाणी कितपत शुद्ध, याबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणी विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. परिणामी नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. पाच रुपयांमध्ये विकली जाणारी बाटली २० ते २५ रुपयांना विक्री होत असलेले हे पाणी ठंडा है पर गंदा है, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

विविध सण, उत्सव, लग्न, पार्ट्या तसेच हॉटेल, शासकीय कार्यालये, खासगी कंपन्यांमध्ये २० लिटर जारच्या पाण्याला मागणी वाढल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहे. मात्र, सध्या कमी भांडवल व कमी जागेत जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जात आहे. बाटली बंद तसेच कॅनचे पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागही दुर्लक्ष करतात. यातून ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोरमधील पाणी केवळ थंड करून विकले जात आहे. ते पाणी आरोग्यास खूप घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, हे तपासण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पाणी नमुनेही तपासले जातात

अन्न व औषध प्रशासनाकडून केवळ बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासले जातात. वर्षभरात अनेक बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासल्याची माहिती आहे. मात्र, जार आणि कॅनमधील पाणी तपासण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला नाही, हे विशेष.

मनुष्यबळही कमी पण, काम व्यवस्थित

अन्न व औषध प्रशासन विभागात काही जागा रिक्त आहेत. पण, त्या येत्या काळात भरून निघतील. मात्र, यामुळे कामात कुठलाही अडथळा येत नसून कामे अगदी सुरळीत होत असल्याची माहिती आहे.

विनापरवानगी प्लांट अन् पाण्याची विक्री

शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना प्लान्ट आणि पाण्याची विक्री होत असून याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे. दोन वर्षांपूर्वी देखील हा मुद्दा उपस्थित झाला असता खासदारांनी स्वत: मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. मात्र, आजघडीला हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विक्रेत्यांवर बंधन नाही

अनेक ठिकाणी विनापरवानगी पाण्याची विक्री होत असून या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अनेकदा बोअरमधून किंवा विहिरीतून पाण्याचा उपसा करून ते पाणी थंड करून विक्री केली जाते.

चांगले बाटलीबंद पाणी कसे ओळखायचे?

अन्न व औषध प्रशासनाला केवळ पॅकेज ड्रिकिंग वॉटरची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. त्या अनुषंगाने ज्या बाटलीवर आयएसआय किंवा व्हीआयएसचे चिन्ह तसेच त्याचे सील बरोबर असेल असेच पाणी शुद्ध असल्याचे समजावे. आयएसआयचे नाव आता व्हीआयएस असे झाले आहे.

पॅकेज ड्रिंकींग वॉटरची बाटली शुद्ध आहे की नाही, याची तपासणी अन्न व औषध विभागाकडून केली जाते. पाण्याचे नमुनेही घेतले जातात. पण, भूगर्भातून पाण्याचा उपसा होत असेल तर खनिकर्म विभागाकडून तपासणी आवश्यक असते. आमच्या विभागाकडून कारवाई केली जाते.

- जयंत वाणे, सहायक आयुक्त अन्न व औषध विभाग

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य