शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाने घेतला घास! मृतदेह नेला २०० मीटर फरफटत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 12:24 IST

ताडगाव परिसरातील घटना

समुद्रपूर/गिरड : वेट, वॉच ॲण्ड अटॅक करून पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्याला गतप्राण केले. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ११ वाजताच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव शेत शिवारात घडली. गोविंदा लहानू चौधरी (६१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला वनविभागाच्या वतीने दहा लाखांची तातडीची शासकीय मदत देण्यात आली आहे.

ताडगाव येथील शेतकरी गोविंदा चौधरी हे नेहमीप्रमाणे बैल घेऊन शेतात गेले होते. दरम्यान, झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गोविंदा याच्यावर हल्ला चढवत त्याला ठार केले. शिवाय गोविंदाचा मृतदेह २०० मीटर ओढत नेला. ही बाब परिसरातील काही शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अशातच पट्टेदार वाघाने घटनास्थळावरून धूम ठोकली.

गोविंदा याला वाघाने गतप्राण केल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार, समुद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, गिरडचे ठाणेदार सुनील दहिभाते यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या संबंधित अधिकाऱ्यांसह मंगरूळचे सरपंच विनायक श्रीरामे, क्षेत्रसहायक गोपाल येटरे आदींनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. वाघाने शेतकऱ्याला गतप्राण केल्याची माहिती मिळताच माजी आमदार राजू तिमांडे यांनी ताडगाव गाठून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

वनविभागाने दिली दहा लाखांची तातडीची मदत

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी गोविंदा चौधरी याच्या कुटुंबीयांना वनविभागाने तातडीची शासकीय मदत म्हणून दहा लाखांचा धनादेश वितरित केला आहे. हा शासकीय मदतीचा धनादेश सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार, समुद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे.

आवश्यक ठिकाणी बसविलेय ट्रॅप कॅमेरे

शेतकऱ्यावर हल्ला करणारा वाघ नेमका कुठला याची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच वाघाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने ताडगाव परिसरात आवश्यक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. शिवाय वनविभागाच्या दोन चमू वाघाच्या मागावर रवाना झाल्या आहेत.

वनविभागाचा नागरिकांना दक्षतेचा इशारा

समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव परिसरात पट्टेदार वाघाने शेतकऱ्याला ठार केल्याने ताडगावसह परिसरातील दहा गावांना वनविभागाच्या वतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर काही मार्गदर्शक सूचना वनविभागाने ग्रामस्थांना दिल्या आहेत. नागरिकांनीही या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरीDeathमृत्यूwardha-acवर्धा