शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वन्यजीवांसाठी बोर व्याघ्रप्रकल्पात ७५ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:05 PM

बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तर उर्वरित पाणवठ्यांमध्ये चार टँकरद्वारे पाणी भरले जात आहे.

ठळक मुद्दे२८ ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून, तर उर्वरित ठिकाणी टँकरने होतो पाणीपुरवठा

रितेश वालदे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तर उर्वरित पाणवठ्यांमध्ये चार टँकरद्वारे पाणी भरले जात आहे. जंगलातच पाणी मिळत असल्याने बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबली आहे.प्राप्त माहितीनुसार, ८१२.३२ हेक्टर क्षेत्रात तसेच १३८.१२ चौरस किमीमध्ये बोर व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. यात बोर व न्युबोर असे दोन भाग आहेत. वर्धा व नागपूर जिल्ह्यात त्यांची सीमा आहे. राज्यातील जैविक विविधता आणि विपुलप्रमाणात वनसपदा यामुळे वन्यप्राण्यांची संख्याही येथे मोठी आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना जंगल क्षेत्रातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी के. वाय. तळवेकर, जी. एफ. लुचे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ७५ पाणवठ्यांची स्वच्छता करून त्यात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यापैकी तीन पाणवठ्यात नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून, २८ पाणवठ्यांमध्ये सौरउर्जेचा वापर करून तर ४४ पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरले जात आहे. या सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकले जात असल्याने संभाव्य मनुष्य व वन्य जीव संघर्ष टाळण्यास मदत होत आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यासाठी तीन शासकीय तर एक खासगी टँकरचा वापर केल्या जात आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात छोटा व्याघ्रप्रकल्प म्हणून बोरची ओळख. परंतु, येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने, शिवाय सदर पाणवठ्यांवर अनेक वन्यप्रेमींसह पर्यटकांना सध्या वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होत आहे.वन्यप्राण्यांसह पक्ष्यांनाही आधार१३८.३२ चौरस किमी परिसरात पसरलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्याना सदर पाणवठे आधार देणारे ठरत आहे. बोर व्याघ्र मध्ये चितळ, सांबर, अस्वल, चिकारा, चौसिगा, रानकुत्रे, निलगाय, रानडुकरे, यासह वाघ, बिबट आदी वन्य प्राणी आहेत. सदर वन्यप्राण्यासोबत व्याघ्र प्रकल्पातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांसाठीही हे पाणवठे फायद्याचे ठरत आहे.जंगल सफारी करणाऱ्यांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढबोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्यांद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वन्य प्राण्यांची भटकंती थांबली आहे. असे असले तरी या व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.१९ पाणवठे वाढविलेबोर व्याघ्र प्रकल्पात २०१८ मध्ये ५६ पाणवठे होते. तर यंदा पाण्याची कमतरता भासत असल्याने आणि जंगलातच वन्य प्राण्यांना पाणी मिळावे या उद्देशाने १९ नवीन पाणवठे तयार करण्यात आले आहे. परिणामी, सध्या पाणवठ्यांची संख्या ७५ झाली आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प