शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

६३,५९५ शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:49 AM

कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना : उर्जामंत्र्यांची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा

ऑनलाईन लोकमत वर्धा : कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले. यामुळे जोडणी कपातीच्या संकटातून बचावाकरिता उर्जामंत्र्यांनी नवी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार तीन ते पाच हजार रुपये भरून जोडणी कायम ठेवण्यात येत आहे. या घोषणेचा लाभ जिल्ह्यातील ६३ हजार ५९५ शेतकºयांना होणार आहे.शेतकºयांची थकबाकी ३० हजारांच्या आत असल्यास ३ हजार रुपये आणि ३० हजारांच्या वर थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. योजना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. शिवाय बºयाच शेतकऱ्यांना त्यांच्या देयकाची दुरूस्ती करावयाची आहे. त्याकरिता १ ते ३० डिसेंबरपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे. हा निर्णय होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या जोडण्या कापण्यात आल्या आहेत. यापैकी जे शेतकरी रक्कम भरतील त्यांची कापलेली वीज तत्काळ जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना त्यांची देयके वाढीव आली आहे असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय होणार असलेल्या शिबिरात आपली तक्रार करावी, असे कळविण्यात आले आहे. या तक्रारीवर कारवाई करण्याकरिता विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.वर्धा जिल्ह्यात एकूण ६८ हजार १८० शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे. त्यांच्याकडे ६३ कोटी ८६ लाख ७१ हजार ८७३ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जून आणि मार्च महिन्यातील आहे. या दोन महिन्याच्या थकबाकीदारांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणकडून मिळालेल्या माहितीवरून दिसत आहे. सध्या शेतकºयांच्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कमही भरणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महावितरणने यातूनही शेतकºयांना सूट द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.