शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

‘बापूं’च्या जिल्ह्यात ६०२ महिला अत्याचाराला बळी; ११ महिन्यांतील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:12 IST

विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ

चैतन्य जोशी

वर्धा :वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून जगात ओळख आहे. मात्र, याच जिल्ह्यात महिलांवरील होणारे अत्याचारही तेवढेच वाढते आहे. महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पोलिस दप्तरी नोंद झालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. यात मागील ११ महिन्यांत जवळपास ६०२ महिला व मुली विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अत्याचार, विनयभंगाच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिस विभागाकडून घटनेचे गांभीर्य पाहून आरोपींवर तत्काळ अटकेची कारवाईदेखील केली जाते. मात्र, सदैव अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या ‘बापूं’च्याच जिल्ह्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत तब्बल १०३ मुलींचे अपहरण झाले. यापैकी ९२ मुलींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले, तर तब्बल ६२४ महिला मिसिंग झाल्या असून, यापैकी ४५३ महिलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

यातील बहुतांश गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. संशयितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील महिला व मुलींवरील होणारे अत्याचार चिंताजनक असल्याचे ११ महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याला विकृत मानसिकतादेखील तेवढीच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

वर्षभरात पाच महिलांचा खून

जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत चार महिलांची विविध कारणांतून हत्या करण्यात आल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. पोलिसांनी जवळपास सर्वच गुन्ह्यांचा छडा लावला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तळेगावच्या सत्याग्रही घाटात अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे आहे, तर महिलांच्या खुनाचे प्रयत्नही झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी ७ महिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. सर्व हल्लेखोरांना पोलिसांनी अटकही केली.

जिल्ह्यात बलात्काराची मालिकाच...

जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात बलात्कार-विनयभंगाच्या गुन्ह्यांची मालिकाच सुरू राहिली. मागील अकरा महिन्यांत ९२ महिलांवर, तर २७ अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी पडल्या. २०१ महिलांचा, तर ५६ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला. बहुतांश गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. काही प्रकरणांची सुनावणीदेखील सुरू झाली आहे.

१३ जणी ठरल्या आत्महत्येच्या बळी

कौटुंबिक, सावकारी, आर्थिक चणचण, मानसिक आजार, नैराश्य यातून १३ महिलांनी स्वत:चा जीव गमावला आहे. हुंडाबळीच्या घटना अजूनही जिल्ह्यात घडत आहेत. चारित्र्याचा संशय, माहेरून पैसा आणावा यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या. याच कारणांचा त्रास सहन न झाल्याने ५८ महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठून सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

‘त्या’ १८२ जणी गायबच!

जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान महिला मिसिंग, तर अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. १०३ मुलींचे अपहरण, तर ६२४ महिला मिसिंग झाल्या. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषणच्या पथकाने यापैकी ९२ मुलींना, तर ४५३ महिलांचा छडा लावून संबंधित महिला व मुलींना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, अजूनही ११ मुली आणि १७१ महिला गायब असून, मिळून आलेल्या नाहीत.

महिला अत्याचाराची आकडेवारीवर दृष्टिक्षेप

  • हत्या - ०४
  • महिला अत्याचार -९२
  • अल्पवयीनांवर अत्याचार - ६४
  • विनयभंग - २०१
  • अल्पवयीनांचा विनयभंग - ५६
  • हत्येचा प्रयत्न - ०७
  • अश्लील इशारे - ०४
  • आत्महत्येस प्रवृत्त करणे - १३
  • हुंड्यासाठी छळ - ५८
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणwardha-acवर्धा