शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

‘बापूं’च्या जिल्ह्यात ६०२ महिला अत्याचाराला बळी; ११ महिन्यांतील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:12 IST

विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ

चैतन्य जोशी

वर्धा :वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून जगात ओळख आहे. मात्र, याच जिल्ह्यात महिलांवरील होणारे अत्याचारही तेवढेच वाढते आहे. महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पोलिस दप्तरी नोंद झालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. यात मागील ११ महिन्यांत जवळपास ६०२ महिला व मुली विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अत्याचार, विनयभंगाच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिस विभागाकडून घटनेचे गांभीर्य पाहून आरोपींवर तत्काळ अटकेची कारवाईदेखील केली जाते. मात्र, सदैव अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या ‘बापूं’च्याच जिल्ह्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत तब्बल १०३ मुलींचे अपहरण झाले. यापैकी ९२ मुलींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले, तर तब्बल ६२४ महिला मिसिंग झाल्या असून, यापैकी ४५३ महिलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

यातील बहुतांश गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. संशयितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील महिला व मुलींवरील होणारे अत्याचार चिंताजनक असल्याचे ११ महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याला विकृत मानसिकतादेखील तेवढीच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

वर्षभरात पाच महिलांचा खून

जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत चार महिलांची विविध कारणांतून हत्या करण्यात आल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. पोलिसांनी जवळपास सर्वच गुन्ह्यांचा छडा लावला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तळेगावच्या सत्याग्रही घाटात अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे आहे, तर महिलांच्या खुनाचे प्रयत्नही झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी ७ महिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. सर्व हल्लेखोरांना पोलिसांनी अटकही केली.

जिल्ह्यात बलात्काराची मालिकाच...

जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात बलात्कार-विनयभंगाच्या गुन्ह्यांची मालिकाच सुरू राहिली. मागील अकरा महिन्यांत ९२ महिलांवर, तर २७ अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी पडल्या. २०१ महिलांचा, तर ५६ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला. बहुतांश गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. काही प्रकरणांची सुनावणीदेखील सुरू झाली आहे.

१३ जणी ठरल्या आत्महत्येच्या बळी

कौटुंबिक, सावकारी, आर्थिक चणचण, मानसिक आजार, नैराश्य यातून १३ महिलांनी स्वत:चा जीव गमावला आहे. हुंडाबळीच्या घटना अजूनही जिल्ह्यात घडत आहेत. चारित्र्याचा संशय, माहेरून पैसा आणावा यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या. याच कारणांचा त्रास सहन न झाल्याने ५८ महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठून सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

‘त्या’ १८२ जणी गायबच!

जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान महिला मिसिंग, तर अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. १०३ मुलींचे अपहरण, तर ६२४ महिला मिसिंग झाल्या. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषणच्या पथकाने यापैकी ९२ मुलींना, तर ४५३ महिलांचा छडा लावून संबंधित महिला व मुलींना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, अजूनही ११ मुली आणि १७१ महिला गायब असून, मिळून आलेल्या नाहीत.

महिला अत्याचाराची आकडेवारीवर दृष्टिक्षेप

  • हत्या - ०४
  • महिला अत्याचार -९२
  • अल्पवयीनांवर अत्याचार - ६४
  • विनयभंग - २०१
  • अल्पवयीनांचा विनयभंग - ५६
  • हत्येचा प्रयत्न - ०७
  • अश्लील इशारे - ०४
  • आत्महत्येस प्रवृत्त करणे - १३
  • हुंड्यासाठी छळ - ५८
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणwardha-acवर्धा