शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

संपकाळात लालपरीच्या एकाच दिवशी ५० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 12:34 IST

आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांना मिळाला दिलासा दोन डेपोतील बसेस आगारातच उभ्या

वर्धा : दिवाळीपासून रापम कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने रापमच्यावतीने नाममात्र बसेस सोडल्या जात आहेत. असे असले तरी गुरुवारी एकाच दिवशी वर्धा व पुलगाव वगळता तीन आगारातील बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्या असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी तसेच तळेगाव या पाच आगारात एकूण २१७ बसेस आहेत. दिवाळीपूर्वी या बसेसच्या जोरावरच दररोज किमान ८०० हून अधिक बसफेऱ्यांचे नियोजन केले जायचे. त्यावेळी दररोज किमान २५ लाखांचे उत्पन्न वर्धा विभागाला व्हायचे. पण दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला. आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट तयार होत काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले असले तरी प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर आलेली नाही. अशातच आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत.

पोलीस बंदोबस्तात सोडली जाते बस

संपकाळात एसटीवर दगडफेक करण्यात आल्याच्या एकूण तीन घटना वर्धा जिल्ह्यात घडल्या. या नुकसानग्रस्त बसपैकी दोन बसेस आर्वी आगाराच्या तर एक यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आगाराची आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, तळेगाव व आर्वी आगारातून सध्या पोलीस बंदोबस्तातच बसेस सोडल्या जात आहेत.

टॅग्स :state transportएसटीST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलन