शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

संपकाळात लालपरीच्या एकाच दिवशी ५० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 12:34 IST

आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांना मिळाला दिलासा दोन डेपोतील बसेस आगारातच उभ्या

वर्धा : दिवाळीपासून रापम कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने रापमच्यावतीने नाममात्र बसेस सोडल्या जात आहेत. असे असले तरी गुरुवारी एकाच दिवशी वर्धा व पुलगाव वगळता तीन आगारातील बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्या असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी तसेच तळेगाव या पाच आगारात एकूण २१७ बसेस आहेत. दिवाळीपूर्वी या बसेसच्या जोरावरच दररोज किमान ८०० हून अधिक बसफेऱ्यांचे नियोजन केले जायचे. त्यावेळी दररोज किमान २५ लाखांचे उत्पन्न वर्धा विभागाला व्हायचे. पण दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला. आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट तयार होत काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले असले तरी प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर आलेली नाही. अशातच आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत.

पोलीस बंदोबस्तात सोडली जाते बस

संपकाळात एसटीवर दगडफेक करण्यात आल्याच्या एकूण तीन घटना वर्धा जिल्ह्यात घडल्या. या नुकसानग्रस्त बसपैकी दोन बसेस आर्वी आगाराच्या तर एक यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आगाराची आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, तळेगाव व आर्वी आगारातून सध्या पोलीस बंदोबस्तातच बसेस सोडल्या जात आहेत.

टॅग्स :state transportएसटीST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलन