शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार लिटर स्वच्छ पाणी गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:26 IST

पवनार येथून वर्धेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी परिसरात फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी कमीत कमी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

ठळक मुद्देमुख्य जलवाहिनी फुटली : दुरुस्तीसाठी लागणार दोन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पवनार येथून वर्धेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी परिसरात फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी कमीत कमी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, पवनारच्या धाम नदी पात्रातून पाण्याची उचल करून येथीलच शुद्धीकरणात पाणी स्वच्छ करण्यात येते. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्याचा वर्धा शहराला पुरवठा केल्या जातो. वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासनाच्यावतीने सहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यातच शहरातील अनेक विहिरी आणि बोअरवेल कोरड्या झाल्याने नागरिकांही घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अशातच ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने व जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार असून नागरिकांच्या अडचणीत भरच पडणार आहे. या घटनेचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. अचानक फुटलेल्या जलवाहिनीच्या घटनेमुळे न.प. प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.आणखी जलवाहिनी फुटण्याची शक्यतापवनार ते दत्तपूर टि-पॉर्इंटपर्यंतची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असली तरी पुढील जलवाहिनी ही सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. तापमानातील बदलामुळे ही जलवाहिनी फुटली असावी असा अंदाज न.प.च्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात असून वेळीच नवीन जलवाहिनी न टाकल्यास कुजलेली ही जुनी जलवाहिनी आणखी कुठून ना कुठुन फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.फुटलेली जलवाहिनी ५० वर्षे जुनीवर्धा शहराला पाणी पुरवठा करणाºया पवनार ते दत्तपूर टि-पॉर्इंटपर्यंतची मुख्य जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या सहकार्याने नवीन टाकण्यात आली आहे. परंतु, त्यानंतर वर्धेच्या दिशेने येणारी मुख्य जलवाहिनी ही सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. अशातच ही जुनी जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयाजवळ फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेल्याचे सांगण्यात आले.अन्यथा वाहून गेले असते १ लाख लिटर पाणीज्या वेळी ही जलवाहिनी फुटली त्यावेळी या जलवाहिनीच्या माध्यमातून पूर्ण दाबाने वर्धेच्या दिशेने पाणी येत नव्हते. जे पाणी वाहून गेले ते या जलवाहिनीत पूर्वीच होते. जर पूर्ण दाबाने वर्धेच्या दिशेने पाणी येत असताना ही जलवाहिनी फुटली असती तर कमीत कमी १ लाख लिटर पाणी वाहून गेले असते असे सांगण्यात आले.बांधकाम विभागाने मागितले प्राकलनदत्तपूर टि-पॉर्इंट ते आरती चौक पर्यंतची नवीन जलवाहिनी टाकण्याचे वर्धा न.प. प्रशासनाच्या विचाराधीन आहे; पण निधी अभावी हे काम सध्या थंडबस्त्यात आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने दत्तपूर टि-पॉर्इंट ते आरती चौक पर्यंत जलवाहिनी टाकण्या संदर्भातील प्राकलन (इस्टीमेट) मागीतले. त्यानंतर पालिका प्रशासनानेही सदर प्राकलन बांधकाम विभागाला दिले. मात्र, सध्या घोड अडले कुठे हे न उलगडणारे कोड ठरत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई