शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

३० रुपयाचे फलक ग्रामस्थांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 10:27 PM

गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाच्या नावावर गावकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आ.) : गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विरुळ गावासह परिसरातील काही गावात खासगी इसमांकडून नागरिकांना घराच्या दारावर लावण्याकरिता स्वच्छ भारत अभियानचे फलक दिल्या जात आहे. सदर इसम स्वत:च हे फलक लावून देत प्रत्येकाकडून तीस रुपये घेत असल्याचे सांगितल्या जाते. याबाबत ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून कोणताही आदेश नसताना ग्रामस्थांकडून फलकाच्या नावावर तीस रुपये वसूल करणारे कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात काही खाजगी इसम गावात आले. त्यांनी गावातील प्रत्येकांच्या घरावर स्वच्छ भारत अभियानाचे फलक दारावर लावले. काहींनी याकडे दुर्लक्ष करीत फलक लावून घेतले व त्याचे पैसेही दिले. पण, ग्रामपंचायतलाही याबाबत कुठलाच आदेश नसल्याचे लक्षात आल्यावर नागरिक सतर्क झाले. ग्रामपंचायतला माहिती नसतानाही सदर इसम कसे काय गावात येऊन प्रत्येकाच्या घरावर फलक लावू शकतो?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता गावात कुठेही स्वच्छता दीसत नाही. गावातील नाल्या तुंबल्या आहे. शेणखत रस्त्यावर पडून असल्याने गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. हगणदारीमक्तीचा बोजवारा उडाला आहे. यातुनच मागील वर्र्षी साथरोग पसरुन एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. गावात अशी स्वच्छतेचा असा बोजवारा उडाला असताना गावातील प्रत्येक घरावर स्वच्छ भारत अभियानचे फलक लावण्याचा सपाटा सुरु आहे. प्रत्येकाकडून तीस रुपये घेऊन हजारो रुपये उकळले जात आहे. त्यामुळे यामार्ग कर्ता करविता कोण? याचा शोध घेणे गरजेचे आहे. हाही आदेश कदाचित जिल्हा परिषदेतून तर धडकला नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करु न माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान