शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आरटीईच्या 1 हजार 129 जागांसाठी 3 हजार 306 अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी आठहर तालुक्यात २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता ११८ शाळांमध्ये १ हजार १२९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ११६ शाळांमधील पहिलीकरिता १ हजार ८१ तर २ शाळांमधील नर्सरीकरिता ४८ जागांचा समावेश आहे.

ठळक मुद्देबालकांना मोफत प्रवेश : पहिलीसाठी ११६ तर नर्सरीसाठी दोन शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत दरवर्षी आरटीई-२५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. याही वर्षी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून अर्ज दाखल करण्याकरिता ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील १ हजार १२९ जागांकरिता तब्बल ३ हजार ३०६ बालकांनी अर्ज दाखल केले आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी आठहर तालुक्यात २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता ११८ शाळांमध्ये १ हजार १२९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ११६ शाळांमधील पहिलीकरिता १ हजार ८१ तर २ शाळांमधील नर्सरीकरिता ४८ जागांचा समावेश आहे. १ हजार १२९ जागांकरिता तब्बल ३ हजार ३०६ बालकांनी अर्ज दाखल झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. 

आता लक्ष लॉटरीकडेराज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज दाखल झाल्यानंतर आता लॉटरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याहीवर्षी कोरोनाचा प्रकोप असल्याने एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने लॉटरी निघण्याची शक्यता आहे. यात कुणाला संधी मिळणार ही येणारी वेळच सांगणार आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील ११८ शाळांनी नोंदणी केली आहे. यात ११६ शाळांनी पहिलीसाठी तर दोन शाळांनी नर्सरीसाठी नोंदणी केली.३० मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती. त्यामुळे ३ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. आता लॉटरीनंतर प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाईल.- निंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथ.

..तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देणे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमुळे सर्वसामान्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळतो. पण, यातील वेळखाऊ व किचकट आहे.- सुरेश देशमुख 

खासगी शाळांमध्ये पहिलीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास दहा हजार रुपयांपेक्षा अधिक शुल्क मोजावे लागतात. दरवर्षी शुल्कात वाढ होत असल्याने ती रक्कम भरणे शक्य नाही. त्यामुळे मुलेही शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते. आरटीईमुळे पालकांना आधार मिळतो.- गणेश चलाख

नर्सरीपासूनच मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मोजावे लागतात. दरवर्षी महागडे शिक्षण देणे शक्य होत नाही. तरीही मुलांच्या भवितव्याचा विचार करुन पदमोड करावी लागते. आरटीई प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांना दिलासा मिळत आहे. पण, गरजू वंचित राहू नये.- पुरुषोत्तम ढोले

टॅग्स :Educationशिक्षण