शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

पाटबंधारे विभागात २३४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:17 AM

सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे.

ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप : करावे लागते नेहमीच अतिरिक्त काम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार वर्धा पाटबंधारे विभागात उप कार्यकारी अभियंत्यांचे एक पद मंजूर असून ते गत अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. तर कनिष्ठ अभि./शाखा अभि. /स.अ.श्रेणी-२ चे दोन पदे रिक्त आहेत. आरेखकचे एक, सहा. आरेखकचे एक, वरिष्ठ लिपीकाचे एक, कनिष्ठ लिपीकाचे दोन, टंकलेखकाचे एक, अनुरेखकाचे दोन, स्था. अभियांत्रिकी सहा.चे १२, वाहन चालकाचे तीन, नाईकचे एक, शिपाईचे १६, चौकीदाराची दोन पदे रिक्त आहेत. इतकेच नव्हे तर दप्तर कारकुणची १७, कालवे निरीक्षकाची ७९, मोजणीदारची ४२, संदेशकची ११, कालवे चौकीदारची ३१, कालवे टपलीची नऊ पदे रिक्त आहेत. वर्धा पाटबंधारे विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ३३५ पदे मंजूर असली तरी सध्यास्थिती या विभागात केवळ १०१ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अल्प मनुष्यबळामुळे विविध कामे प्रभावित होत असल्याने सदर विभागात पुरेसे मनुष्यबळ कार्यरत करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.पाण्याचा अपव्यय रोखणे ठरतेय कठीणकालवे निरीक्षकांची ८८ पदे मंजुर असताना सध्या केवळ नऊच कर्मचारी सदर पदावर कार्यरत असल्याचे वास्तव आहे. प्रकल्पातील पाणी सोडल्यावर कुठला कालवा फटला तर नाही ना तसेच कुठे पाण्याचा अपव्यय तर होत नाही ना याची शहानिशा हे कर्मचारी करतात. परंतु, अल्पमनुष्यबळामुळे सध्या होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अनेक अडचणींचा सामनाच वर्धा पाटबंधारे विभागाला करावा लागत आहे.सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकालवे चौकीदार महत्त्वाचे ठरतात. परंतु, सध्यास्थितीत ३३ पैकी ३१ कालवे चौकीदारांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पाठपुराव्याकडे दुर्लक्षच?वर्धा पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. तेथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत व्हावे यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे; पण संबंधित अधिकारी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच करीत असल्याने कार्यरत कर्मचाºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प