शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

१७ हजार ग्रामीण कुटुंबांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:17 AM

शहराशेजारच्या पिपरी (मेघे) सह इतर ११ ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या सदर ग्रामीण भागातील १७ हजार कुटुंबियांवर पाणीपट्टी कर घेताना शहरी दर थोपवून त्याची वसूली केली जात आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा प्रकार : पाण्यासाठी लावले शहरी दर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराशेजारच्या पिपरी (मेघे) सह इतर ११ ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या सदर ग्रामीण भागातील १७ हजार कुटुंबियांवर पाणीपट्टी कर घेताना शहरी दर थोपवून त्याची वसूली केली जात आहे. एका सुजान नागरिकांने त्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाद मागीतल्यावर त्याच्या पाणी पट्टीकरात सुधारणा करण्यात आली. शिवाय त्याच्याकडून सध्या ग्रामीण कर लावून पाणीपट्टी कर वसूल केला जात आहे. परंतु, इतर नागरिकांकडून शहरी दरातच सदर कर घेतल्या जात असल्याने या प्रकरणी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहराशेजारच्या १३ ग्रा.पं. करिता वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे कार्यान्वीत आहे. शिवाय सदर ग्रा.पं.तील रहिवाशांकडून पाणीपट्टी कर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वसूल करते. पाणीपट्टी कराचे शहरीकरिता आणि ग्रामीण करिता वेगवेळे दर असताना सध्या वर्धा शहराशेजारी असलेल्या या १३ ग्रा.पं.तील सुमारे १७ हजार कुटुंबियांकडून शहरी दरात पाणीपट्टी कर वसूल केला जात आहे. आपण ग्रामीण भागातील रहिवासी असल्याने आपल्याकडून ग्रामीण दरातच पाणीपट्टी कर घेतल्या गेला पाहिजे.शहरी दरात घेतल्या जात असलेला पाणी पट्टीकर अन्याकारक आणि आर्थिक पिळवणूक करणारा असल्याने पिपरी (मेघे) येथील वासूदेव पांडुरंग राठोड यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाद मागीतली. राष्ट्रीय ग्राहक आयोगानेही दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेवून राठोड यांच्या बाजूने निर्णय दिला. सदर निर्णयाच्या अनुषंगाने राठोड यांच्या पाणीपट्टीच्या देयकात सुधारणा करण्यात आली आहे. परंतु, वर्धा शहराशेजारच्या इतर १३ ग्रा.पं.तील रहिवाशांकडून सध्या शहरी दरातच पाणीपट्टीकर जीवन प्राधिकरण घेत आहे. हा प्रकार ग्रामीण भागातील रहिवाशांची आर्थिक पिळवणूक करणारा असल्याने या प्रकरणी झटपट योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आहे.आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण सध्या मनमर्जीनेच धोरण राबवित आहे. त्यांचा हा प्रकार ग्रामीण भागातील रहिवाशांच्या अडचणीत भर टाकणारा असल्याने या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.पिपरी (मेघे) येथील वासूदेव राठोड यांच्याप्रमाणे सर्वांना पाण्याची सारखी देयके महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने द्यावी. ही ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे. शहरी दर आकारने ही बाब अन्यायकारकच म्हणावी लागेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून वासूदेव राठोड यांच्या बाजूने संपूर्ण निकाल लागलेला नाही. ते पाणीपट्टी कर भरण्यास तयार नसल्याचे लक्षात आल्यावर निकाल लागेपर्यंत त्यांच्या पाणीपट्टी कराच्या दरात सुधारणा करण्याचे सूचना होत्या. त्या अनुषंगाने आम्ही ती कार्यवाही केली. वास्तविक पाहता हे प्रकरण राष्ट्रीय ग्राहक आयोगाने जिल्हा ग्राहक मंचाकडे पूर्णरविचारासाठी पाठविले आहे. २०११ मध्ये आम्ही हारल्याने हे प्रकरण राज्यापर्यंत पोहोचले होते. तेथे ते खारिज झाल्याने राष्ट्रीय ग्राहक आयोगापर्यंत पोहोचले.- विलास उमाळे, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई