शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

जय श्रीराम, भारत माता की जय, या घोषणा देऊन काय होणार? वरुण गांधींची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:13 IST

Varun Gandhi Criticize BJP: आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सरकारी योजनांची परिस्थिती आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

खासदार वरुण गांधी हे गेल्या काही वर्षांपासून भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथील खासदार असलेले वरुण गांधी यांना भाजपा २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. त्याचदरम्यान, आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सरकारी योजनांची परिस्थिती आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

वरुण गांधी यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकांमुळे ते आता आपली वेगळी वाट चोखाळण्याच्या विचारात आहेत, असे संकेत मिळत आहेत. वरुण गांधी म्हणाले की, जे लोक कर्ज परतफेड करू शकणार नाही. त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील. त्यांच्या संपत्तीचा लिलाव होईल. आता मी विचारतो की, यावर उपाय काय आहे. केवळ घोषणा? जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देऊन काम भागणार आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

वरुण गांधी पुढे म्हणाले की, मी सुद्धा भारतमातेला मानतो. मी हनुमानजींचा भक्त आहे. भगवान राम यांना आपले आराध्य मानतो. आता मी तुम्हाला विचारतो की, आज ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. यावर तोडगा घोषणाबाजी करून होणार आहे की, धोरणात्मक सुधारणांमुळे होणा आहे, असा सवालही त्यांनी विचारला.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश