शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

नऊ मुलाच्या आईचा स्वत:वर राहिला नाही कंट्रोल, २० वर्ष लहान तरुणासोबत...; पतीही हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:38 IST

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली.

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. नऊ मुलांची आई तिचा पती आणि कुटुंबाला सोडून २० वर्ष लहान प्रियकरासोबत पळून गेली. एवढेच नाही तर, या महिलेने घरात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि जमिनीचे कागदपत्रेही पळवून नेले. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

ही घटना उसीहाट पोलीस ठाणे परिसरातील खेडा जलालपूर गावातील आहे. संबंधित महिलेचा पती ओमपाल यांनी सांगितले की, त्यांचे लग्न ३२ वर्षांपूर्वी झाले आणि त्यांना ५ मुली आणि ४ मुलांसह एकूण नऊ मुले आहेत. त्यांच्या एका मुलाचा वयाच्या २१ व्या वर्षी आजाराने मृत्यू झाला. तर, त्यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे लग्न झाले आहे. मात्र, तरीही त्यांची पत्नी एका ३२ वर्षीय तरुणासोबत पळून गेली. शिवाय, महिलेने घरातील दागिने, रोख रक्कम आणि जमिनीची कागदपत्रेही पळवून नेल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

ओमपाल म्हणाले की,  "माझा ३२ वर्षांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.  मी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट केले, मुलांना वाढवले ​​आणि माझ्या पत्नीच्या नावावर चार एकर जमीन केली. पण तिने सर्व काही धुळीत मिळवून आणि नाते तोडले."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीने तिच्यासोबत ४ लाख रुपये किमतीचे दागिने, ५०,००० रुपये रोख रक्कम आणि जमिनीची कागदपत्रे नेले. शेतातील पीक विकल्यानंतर रोख रक्कम घरात ठेवण्यात आली होती. दरम्यान, कौशल (वय, ३०), नीरज (वय, २८), प्रीती (वय, २५), गौरव (वय,  २२), शिवानी (वय, १९), श्यामसुंदर (वय, १६), अखिलेश (वय, १२) आणि अंजली (वय, १०) अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.  त्यापैकी तीन मुली आणि एक मुलगा विवाहित आहे. पत्नीने सर्वात धाकटी मुलगी सोबत नेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश