शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हाहाकार! उत्तर प्रदेशात पावसाचा प्रकोप, 19 जणांचा मृत्यू; 168 गावांना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 10:18 IST

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. सततच्या पावसामुळे आतापर्यंत 19 जणांना जीव गमवावा लागला आहे. हरदोईमध्ये चार, बाराबंकीमध्ये तीन, प्रतापगड आणि कन्नौजमध्ये प्रत्येकी दोन आणि अमेठी, देवरिया, जालौन, कानपूर, उन्नाव, संभल, रामपूर आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी प्रचंड घाबरले आहेत. परंतु राज्याचे मदत आयुक्त जीएस नवीन कुमार म्हणाले की, काळजी करण्याची गरज नाही, सध्या सर्व धरणे सुरक्षित आहेत. उत्तर प्रदेशातील पावसाच्या स्थितीबाबत माहिती देताना मदत आयुक्त जीएस नवीन कुमार म्हणाले की, राज्यात कुठेही चिंतेची परिस्थिती नाही. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशमध्ये सरासरी 31.8 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 6.4 मिमी आणि 497 टक्के जास्त आहे. राज्यात 1 जून 2023 पासून आतापर्यंत 577.4 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी 665.2 मिमी पाऊस पडला, जो सामान्य पावसापेक्षा जास्त होता आणि ते 87 टक्के आहे. 

आयुक्त म्हणाले की, गेल्या 24 तासांत राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये 30 मिमी आणि त्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कोणतीही नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत नाही. 10 जिल्ह्यातील 168 गावांना पुराचा फटका बसला आहे. NDRF, SDRF आणि PAC च्या एकूण 4 टीम पावसाने प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचाव कार्य करत आहेत. लोकांना दिलासा देण्यासाठी एकूण 69674 रेशन किट, 448670 जेवणाची पाकिटे आणि 3150 डिग्निटी किटचे वाटप करण्यात आले आहे. 

राज्यात आतापर्यंत 1101 पूर निवारे, 869 जनावरांच्या छावण्या, ज्यामध्ये चारा इत्यादी व्यवस्था आणि 2869291 जनावरांचे लसीकरण, 1504 फ्लड पोस्ट, 2513 वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय 3421 बोटींचाही बचाव आणि मदतकार्यासाठी वापर करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागातील सुमारे 2775 गोठ्यातील 4,61,778 जनावरे आणि इतर जनावरांसाठी चाराही व्यवस्था करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊस