शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या नावाखाली 3 मुलींनी तब्बल 70 मुलांना घातला गंडा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:05 IST

तरुण जेव्हा लग्नासाठी पोहोचला तेव्हा त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन पाठलाग करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका तरुणाला लग्नाच्या नावाखाली मेरठला बोलावून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तरूणांकडून 12 हजार 500 रुपये आणि चांदीचे पैंजण आधीच घेण्यात आले होते. तरुण जेव्हा लग्नासाठी पोहोचला तेव्हा त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन पाठलाग करण्यात आला. मेरठ पोलिसांनी रविवारी रात्री बनावट मॅरेज ब्युरोच्या सदस्यांना अटक केली. बाहेरच्या शहरातील तरुणांना लग्नाच्या आमिषाने फसवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 मुलींना अटक केली आहे. त्याचवेळी टोळीचा म्होरक्या आणि त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून गेला.

मेडिकल पोलीस स्टेशन हद्दीतील तेजगढीजवळ या बनावट मॅरेज ब्युरो टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही टोळी बनावट मॅरेज ब्युरो चालवून निरपराध तरुण-तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवत असे. येथे तरुण-तरुणींकडून आधीच पैसे आणि दागिने घेतले जात होते. काही दिवसांनी मॅरेज ब्युरो आपली जागा बदलत असे. ग्राहकाने लग्न केल्याचे सांगितल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन पाठलाग केला जायचा. पोलिसांनी या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

गाझियाबादमधील प्रताप विहार येथे राहणारे रामानंद पाठक यांनी पोलिसांना सांगितले की, माझे लग्न होत नव्हते. इंटरनेट आणि मित्रांच्या मदतीने त्याला मेरठमधील शादी संगीत मॅरेज ब्युरोची माहिती मिळाली. त्याने या मॅरेज ब्युरोच्या वेबसाइटवर जाऊन त्याचे प्रोफाईल पोस्ट केले. यानंतर त्याला अंशू नावाच्या तरुणाचा फोन आला. ते म्हणाले की आमचे कार्यालय मेरठ शास्त्री नगर पीव्हीएस मॉलच्या मागे आहे, तिथे या. इथेच आम्ही लग्न लावतो, तुमचं पण करू. अंशूचे म्हणणे खरे मानून ते 2 मे रोजी रामानंद गाझियाबाद येथील कुटुंबीयांसह मेरठ मॅरेज ब्युरोच्या कार्यालयात पोहोचले, जिथे त्याला 3 मुली दाखवण्यात आल्या. 

रामानंद याच्याकडून 12,500 रुपये एडव्हान्स घेण्यात आले. रामानंदने सांगितले की, तुला मुलगी आवडत असेल तर सांग. एक मुलगी पसंत करून रामानंद फायनल झाले. मॅरेज ब्युरोच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की, ज्या मुलीला तुम्ही पसंत केले आहे, तिला चांदीचे पैंजण द्या आणि त्यानंतर 5 दिवसांनी या, कोर्ट मॅरेज करा. रामानंदच्या कुटुंबीयांनी मुलीला चांदीचे पैंजण दिले. लग्नासाठी रामानंद कुटुंबीयांसह कार्यालयात पोहोचले तेव्हा तेथे काहीही नव्हते. मॅरेज ब्युरोच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना धमकावले, असा आरोप आहे. आरोपी म्हणाले, "तू जास्त बोलशील तर तुला मारून टाकू. तू तक्रार केलीस तर जगणार नाहीस. म्हणून शांतपणे पळून जा."

पीडित कुटुंब प्रथम तक्रार करण्यास घाबरत होते. नंतर त्याने या बनावट मॅरेज ब्युरोची गोष्ट मेडिकल स्टेशनवर पोलिसांना सांगितली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे तरुण-तरुणी बसल्याचे दिसले. या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळावरून 3 मुलींना अटक केली. त्यात ती मुलगीही होती, जिला रामानंदने लग्नासाठी फायनल केले होते आणि पैसे दिले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, या 3 मुलींनी एनसीआर आणि उत्तर प्रदेशातील सुमारे 70 मुलांना अशा प्रकारे अडकवले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश