शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:40 IST

बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.

मनोज टिबडेवाल आकाश -

नवी दिल्ली : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाच्या वर्षीची लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

प्रश्न : मैनपुरी येथून आपली पत्नी डिंपल यादव व कनौज येथील लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढवत आहात. या दोन जागांमध्ये नेमके कोण मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल?अखिलेश यादव : आपला धर्म व संस्कृती यांच्या तत्त्वांचा विचार केला तर मैनपुरी येथील उमेदवारच मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल.

प्रश्न : लंडनहून पदवी शिक्षण घेऊन मायदेशात परतलेली अदिती यादव पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर दिसली. आपल्या आईवडिलांसाठी तिने निवडणूक प्रचारही केला. आपली कन्या अदिती हा समाजवादी पक्षाचा भविष्यातील चेहरा आहे का?यादव : राजकारण ही काही सोपी गोष्ट नाही. राजकारणात खूप मेहनत घ्यावी लागते. राजकारण खूप सोपे असते असे वाटणाऱ्या एखाद्याने या क्षेत्रात प्रवेश केला की त्याला या क्षेत्रातील अडचणींची कल्पना येते. इथला प्रवास खडतर आहे.

प्रश्न : उत्तर प्रदेशात निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे, असे आपल्याला वाटते का?यादव : जिथे असे प्रकार घडल्याचा संशय आला, त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. काही ठिकाणी निवडणूक आयोगाने कारवाई केली; तर काही ठिकाणी अद्याप ती झालेली नाही. निवडणूक प्रक्रियेत अनेक अडथळे येऊनही जनता उत्साहाने मतदान करत आहे. यासाठी मी लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.

प्रश्न : सप व काँग्रेस युती लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशात सर्वांत जास्त जागा जिंकेल असे तुम्ही वारंवार सांगत आहात. आपल्याला पूर्वीपासून पाठिंबा देणाऱ्या यादव, मुस्लिम मतदारांबरोबरच मागासवर्गीय, दलित मतदारांनीही तुमच्यासोबत येणे आवश्यक आहे. तसे घडले तरच तुमचा दावा खरा ठरेल, असे वाटते का?यादव : आम्हांला सर्व वर्गांतील मतदारांचा पाठिंबा आहे. मागासवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्वांचा आम्हांला पाठिंबा आहे. 

प्रश्न : दलित मतदार या लोकसभा निवडणुकांत आपल्यासोबत आहेत असे वाटते का? यादव : मी बहुजन समाजातील लोकांना विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांना सांगतो की, बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. बहुजन समाजातील लोक तसेच भारतीय राज्यघटना यांच्याशी भाजपने उभा दावा मांडला आहे. त्यामुळे लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाcongressकाँग्रेस