शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:40 IST

बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.

मनोज टिबडेवाल आकाश -

नवी दिल्ली : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाच्या वर्षीची लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

प्रश्न : मैनपुरी येथून आपली पत्नी डिंपल यादव व कनौज येथील लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढवत आहात. या दोन जागांमध्ये नेमके कोण मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल?अखिलेश यादव : आपला धर्म व संस्कृती यांच्या तत्त्वांचा विचार केला तर मैनपुरी येथील उमेदवारच मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल.

प्रश्न : लंडनहून पदवी शिक्षण घेऊन मायदेशात परतलेली अदिती यादव पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर दिसली. आपल्या आईवडिलांसाठी तिने निवडणूक प्रचारही केला. आपली कन्या अदिती हा समाजवादी पक्षाचा भविष्यातील चेहरा आहे का?यादव : राजकारण ही काही सोपी गोष्ट नाही. राजकारणात खूप मेहनत घ्यावी लागते. राजकारण खूप सोपे असते असे वाटणाऱ्या एखाद्याने या क्षेत्रात प्रवेश केला की त्याला या क्षेत्रातील अडचणींची कल्पना येते. इथला प्रवास खडतर आहे.

प्रश्न : उत्तर प्रदेशात निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे, असे आपल्याला वाटते का?यादव : जिथे असे प्रकार घडल्याचा संशय आला, त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. काही ठिकाणी निवडणूक आयोगाने कारवाई केली; तर काही ठिकाणी अद्याप ती झालेली नाही. निवडणूक प्रक्रियेत अनेक अडथळे येऊनही जनता उत्साहाने मतदान करत आहे. यासाठी मी लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.

प्रश्न : सप व काँग्रेस युती लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशात सर्वांत जास्त जागा जिंकेल असे तुम्ही वारंवार सांगत आहात. आपल्याला पूर्वीपासून पाठिंबा देणाऱ्या यादव, मुस्लिम मतदारांबरोबरच मागासवर्गीय, दलित मतदारांनीही तुमच्यासोबत येणे आवश्यक आहे. तसे घडले तरच तुमचा दावा खरा ठरेल, असे वाटते का?यादव : आम्हांला सर्व वर्गांतील मतदारांचा पाठिंबा आहे. मागासवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्वांचा आम्हांला पाठिंबा आहे. 

प्रश्न : दलित मतदार या लोकसभा निवडणुकांत आपल्यासोबत आहेत असे वाटते का? यादव : मी बहुजन समाजातील लोकांना विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांना सांगतो की, बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. बहुजन समाजातील लोक तसेच भारतीय राज्यघटना यांच्याशी भाजपने उभा दावा मांडला आहे. त्यामुळे लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाcongressकाँग्रेस