शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तिला इंग्रजी बोलता येईना, त्याला हिंदी कळेना, अवघ्या ३ महिन्यात जोडप्याचं मोडलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:25 IST

Marriage News: बदलतं समाजजीवन आणि जीवनशैलीबरोबर समाजात घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र कधी इंग्रजी बोलता न येत असल्याने कुणाचं लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलंय का? उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून अशीच एक घटना समोर आली आहे.

बदलतं समाजजीवन आणि जीवनशैलीबरोबर समाजात घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र कधी इंग्रजी बोलता न येत असल्याने कुणाचं लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलंय का? उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामध्ये पत्नीला इंग्रजी बोलता येत नसल्याने जोडप्याचा घटस्फोट झाल्याचं समोर आलं आहे.  धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याची वर्षभरापूर्वी भेट झाली होती. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. मात्र त्यांचं नातं हे अल्पकालिन ठरलं आहे.

या जोडप्यामधील तरुण हा गुरुग्राममधील एका खासगी बँकेमध्ये नोकरी करतो. तो दक्षिण भारतातील रहिवासी आहे. त्यामुळे त्याला हिंदी बोलता येत नाही. तो वर्षभरापूर्वी ट्रेनिंगसाठी आग्र्याला आला होता. त्यानंतर त्याची आग्रा येथे राहणाऱ्या एका तरुणीशी भेट झाली होती. पुढे भेटीगाठी वाढल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी या दोघांचा विवाहही झाला. दरम्यान, तरुणीने सांगितले की, मागच्या १५ दिवसांपासन ती माहेरी राहत असल्याचेही सांगितले. 

या तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिचा पती इंग्रजीमध्ये बोलायचा. मात्र मला इंग्रजी बोलता येत नव्हती. त्यावरून घरात वाद व्हायचे. त्यातच घरामध्ये केवळ इंज्रजीमध्ये बोलायचं, अशी ताकिद पतीने या महिलेला दिली. त्यामुळे ही तरुणी त्रस्त झाली. तसेच हिंदीत बोलल्याच तिचा पती तिच्यासोबत अपमानास्पद वर्तन करायचा. 

या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कुटुंब कल्याण केंद्रामध्ये बोलावण्यात आले. तिथे त्याने सांगितले की,  मी दक्षिण भारतातील आहे. तसेच हिंदी भाषा मला समजत नाही. मात्र घरात इंग्रजी बोलण्यााबबत त्यांचं एकमत होत नव्हतं. त्यानंतर या पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिप