शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:11 IST

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोपाळगंज जिल्ह्यातील बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघात एका भव्य जाहीर सभेला संबोधित केलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी, मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोपाळगंज जिल्ह्यातील बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघात एका भव्य जाहीर सभेला संबोधित केलं. भाजपा उमेदवार मिथिलेश तिवारी यांच्या समर्थनार्थ जमलेल्या लोकांना संबोधित करताना, मुख्यमंत्री योगी यांनी RJD, काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. "लक्षात ठेवा, ज्यांनी आधी जनावरांचा चारा खाल्ला ते संधी मिळाल्यास गरिबांचं रेशनही खातील" असं म्हणत निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, RJD आणि काँग्रेसनेबिहारला जातीय हिंसाचार, गुन्हेगारी आणि अपहरणाची राजधानी बनवलं होतं. १९९० ते २००५ या त्यांच्या राजवटीत बिहारचे व्यापारी, शेतकरी आणि तरुणांना असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडलं गेलं. त्यावेळी गुन्हेगार राज्य करत होते, अधिकारी घाबरत होते आणि जनता पळून जात होती. बिहारने देशाला भगवान बुद्ध, महावीर आणि जयप्रकाश नारायण सारखे महान व्यक्तिमत्त्व दिलं, परंतु ज्यांनी या भूमीला अंधारात ढकललं ते आता सत्तेत परतण्याचं स्वप्न पाहत आहेत.

मोदींच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या नवीन उंचीवर

योगी म्हणाले की, आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, बिहार आणि देश विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचत आहे. आज प्रत्येक गरीबाच्या घरात स्वयंपाकाचा गॅस आहे, सन्मान निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचत आहे आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रेशन मिळत आहे. पण लक्षात ठेवा, ज्यांनी आधी प्राण्यांसाठीचा चारा खाल्ला ते संधी मिळाल्यास गरिबांसाठीचं रेशनही खातील.

"रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, मंदिराच्या बांधकामाला विरोध"

काँग्रेस, RJD आणि समाजवादी पक्षावर अंधश्रद्धाविरोधी असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री योगी म्हणाले, या लोकांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, राम मंदिराच्या बांधकामाला विरोध केला. आज अयोध्येत भव्य राम मंदिर तयार आहे आणि सीतामढी येथील माता जानकी मंदिराचं बांधकाम भारताच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे.

सार्वजनिक सभेतील मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, बिहार आता कंदिलाच्या मंद प्रकाशातून विकासाच्या तेजस्वी प्रकाशाकडे पुढे गेला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केलं की, बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सन्मानासाठी भाजपा उमेदवार मिथिलेश तिवारी यांचा मोठ्या फरकाने विजय सुनिश्चित करा.

ही निवडणूक बिहारला पुढे नेण्यासाठी

गेल्या दोन दशकांमध्ये एनडीए सरकारने मजबूत केलेल्या विकासाचा पाया चालू ठेवण्यासाठी लोकांनी एकत्र राहिले पाहिजे. तुम्हाला पुन्हा गुन्हेगारी, अराजकता आणि अपहरणाचे दिवस पाहायचे आहेत का? ही निवडणूक बिहारला पुढे नेण्यासाठी आणि गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचा अंधार कायमचा दूर करण्यासाठी आहे. बैकुंठपूरच्या लोकांनी नेहमीच सत्याला पाठिंबा दिला आहे आणि यावेळी पुन्हा एनडीए मोठ्या विजयासह इतिहास रचणार आहे असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi slams RJD, Congress for Bihar's crime-ridden past.

Web Summary : Yogi Adityanath criticized RJD and Congress for turning Bihar into a hub of crime and violence during their rule. He highlighted NDA's development work under Modi, urging voters to reject a return to lawlessness and support BJP's Mithilesh Tiwari for continued progress.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024