शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:11 IST

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोपाळगंज जिल्ह्यातील बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघात एका भव्य जाहीर सभेला संबोधित केलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी, मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोपाळगंज जिल्ह्यातील बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघात एका भव्य जाहीर सभेला संबोधित केलं. भाजपा उमेदवार मिथिलेश तिवारी यांच्या समर्थनार्थ जमलेल्या लोकांना संबोधित करताना, मुख्यमंत्री योगी यांनी RJD, काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. "लक्षात ठेवा, ज्यांनी आधी जनावरांचा चारा खाल्ला ते संधी मिळाल्यास गरिबांचं रेशनही खातील" असं म्हणत निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, RJD आणि काँग्रेसनेबिहारला जातीय हिंसाचार, गुन्हेगारी आणि अपहरणाची राजधानी बनवलं होतं. १९९० ते २००५ या त्यांच्या राजवटीत बिहारचे व्यापारी, शेतकरी आणि तरुणांना असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडलं गेलं. त्यावेळी गुन्हेगार राज्य करत होते, अधिकारी घाबरत होते आणि जनता पळून जात होती. बिहारने देशाला भगवान बुद्ध, महावीर आणि जयप्रकाश नारायण सारखे महान व्यक्तिमत्त्व दिलं, परंतु ज्यांनी या भूमीला अंधारात ढकललं ते आता सत्तेत परतण्याचं स्वप्न पाहत आहेत.

मोदींच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या नवीन उंचीवर

योगी म्हणाले की, आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, बिहार आणि देश विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचत आहे. आज प्रत्येक गरीबाच्या घरात स्वयंपाकाचा गॅस आहे, सन्मान निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचत आहे आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रेशन मिळत आहे. पण लक्षात ठेवा, ज्यांनी आधी प्राण्यांसाठीचा चारा खाल्ला ते संधी मिळाल्यास गरिबांसाठीचं रेशनही खातील.

"रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, मंदिराच्या बांधकामाला विरोध"

काँग्रेस, RJD आणि समाजवादी पक्षावर अंधश्रद्धाविरोधी असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री योगी म्हणाले, या लोकांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, राम मंदिराच्या बांधकामाला विरोध केला. आज अयोध्येत भव्य राम मंदिर तयार आहे आणि सीतामढी येथील माता जानकी मंदिराचं बांधकाम भारताच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे.

सार्वजनिक सभेतील मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, बिहार आता कंदिलाच्या मंद प्रकाशातून विकासाच्या तेजस्वी प्रकाशाकडे पुढे गेला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केलं की, बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सन्मानासाठी भाजपा उमेदवार मिथिलेश तिवारी यांचा मोठ्या फरकाने विजय सुनिश्चित करा.

ही निवडणूक बिहारला पुढे नेण्यासाठी

गेल्या दोन दशकांमध्ये एनडीए सरकारने मजबूत केलेल्या विकासाचा पाया चालू ठेवण्यासाठी लोकांनी एकत्र राहिले पाहिजे. तुम्हाला पुन्हा गुन्हेगारी, अराजकता आणि अपहरणाचे दिवस पाहायचे आहेत का? ही निवडणूक बिहारला पुढे नेण्यासाठी आणि गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचा अंधार कायमचा दूर करण्यासाठी आहे. बैकुंठपूरच्या लोकांनी नेहमीच सत्याला पाठिंबा दिला आहे आणि यावेळी पुन्हा एनडीए मोठ्या विजयासह इतिहास रचणार आहे असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi slams RJD, Congress for Bihar's crime-ridden past.

Web Summary : Yogi Adityanath criticized RJD and Congress for turning Bihar into a hub of crime and violence during their rule. He highlighted NDA's development work under Modi, urging voters to reject a return to lawlessness and support BJP's Mithilesh Tiwari for continued progress.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024