शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

राहुल गांधींनी एकाच आठवड्यात ४ वेळा घेतलं ऐश्वर्या रायचं नावं; सोशल मीडियात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:36 IST

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत.

लखनौ - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणांची किंवा विधानांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. अनेकदा विरोधी गटातील नेते व कार्यकर्त्यांकडून त्यांना ट्रोलही केलं जातं. अर्थात, काँग्रेस समर्थक राहुल गांधींच्या सोशल बचावासाठी मैदानात उतरतात. आता, पुन्हा एकदा राहुल गांधींच्या भाषणातील त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. यावेळी, राहुल गांधींनी माध्यमांना लक्ष्य करताना अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा नामोल्लेख केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत त्यांनी ४ वेळा ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाव घेतले आहे. 

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. या यात्रेदरम्यान भाषण करताना ते काही उदाहरणं देत केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करतात. मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख केला. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत बोलावलं होतं. पण, तिथे गोरगरिब दिसले नाहीत, असे राहुल गांधींनी म्हटले. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय उपस्थित नव्हती. तर, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची उपस्थिती होती. त्यामुळे, नेटीझन्सकडून राहुल गांधींना ट्रोल केलं जात आहे. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अब्जाधीशांना बोलावलं, सेलिब्रिटींना बोलावलं. पण, आदिवासी, मागास व गोरगरिबांना बोलावलं नाही. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनाही या सोहळ्याला बोलावलं नाही. हा आदिवासी समाजाचा अपमान होता, असे म्हणत राहुल गाधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. युपीतील प्रतापगड जिल्ह्याच्या रामपूर खास येथील इंदिरा चौकात भाषण करताना राहुल गांधींनी हे उदाहरण दिलं. केवळ उद्योगपती आणि अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देऊन मोदी सरकारमध्ये देशातील ७३ टक्के सर्वसामान्य जनतेला काही किंमत नसल्याचे दाखवून दिल्याचंही राहुल यांनी म्हटलं. 

माध्यमांमध्येही सर्वसामान्यांचा आवाज ऐकू येत नाही. मीडियात दिवसभर मोदींना दाखवले जाते, त्यानंतर ऐश्वर्या राय नाचताना दिसून येते, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन भल्ले भल्ले करताना निघून जाईल, असे म्हणत राहुल यांनी माध्यमांनाही लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांनी आपल्या भाषणाचा स्तर खाली येऊ देऊ नये, असेही काहींनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश