शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राहुल गांधींनी एकाच आठवड्यात ४ वेळा घेतलं ऐश्वर्या रायचं नावं; सोशल मीडियात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:36 IST

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत.

लखनौ - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणांची किंवा विधानांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. अनेकदा विरोधी गटातील नेते व कार्यकर्त्यांकडून त्यांना ट्रोलही केलं जातं. अर्थात, काँग्रेस समर्थक राहुल गांधींच्या सोशल बचावासाठी मैदानात उतरतात. आता, पुन्हा एकदा राहुल गांधींच्या भाषणातील त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. यावेळी, राहुल गांधींनी माध्यमांना लक्ष्य करताना अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा नामोल्लेख केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत त्यांनी ४ वेळा ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाव घेतले आहे. 

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. या यात्रेदरम्यान भाषण करताना ते काही उदाहरणं देत केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करतात. मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख केला. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत बोलावलं होतं. पण, तिथे गोरगरिब दिसले नाहीत, असे राहुल गांधींनी म्हटले. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय उपस्थित नव्हती. तर, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची उपस्थिती होती. त्यामुळे, नेटीझन्सकडून राहुल गांधींना ट्रोल केलं जात आहे. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अब्जाधीशांना बोलावलं, सेलिब्रिटींना बोलावलं. पण, आदिवासी, मागास व गोरगरिबांना बोलावलं नाही. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनाही या सोहळ्याला बोलावलं नाही. हा आदिवासी समाजाचा अपमान होता, असे म्हणत राहुल गाधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. युपीतील प्रतापगड जिल्ह्याच्या रामपूर खास येथील इंदिरा चौकात भाषण करताना राहुल गांधींनी हे उदाहरण दिलं. केवळ उद्योगपती आणि अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देऊन मोदी सरकारमध्ये देशातील ७३ टक्के सर्वसामान्य जनतेला काही किंमत नसल्याचे दाखवून दिल्याचंही राहुल यांनी म्हटलं. 

माध्यमांमध्येही सर्वसामान्यांचा आवाज ऐकू येत नाही. मीडियात दिवसभर मोदींना दाखवले जाते, त्यानंतर ऐश्वर्या राय नाचताना दिसून येते, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन भल्ले भल्ले करताना निघून जाईल, असे म्हणत राहुल यांनी माध्यमांनाही लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांनी आपल्या भाषणाचा स्तर खाली येऊ देऊ नये, असेही काहींनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश