शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी एकाच आठवड्यात ४ वेळा घेतलं ऐश्वर्या रायचं नावं; सोशल मीडियात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:36 IST

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत.

लखनौ - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणांची किंवा विधानांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. अनेकदा विरोधी गटातील नेते व कार्यकर्त्यांकडून त्यांना ट्रोलही केलं जातं. अर्थात, काँग्रेस समर्थक राहुल गांधींच्या सोशल बचावासाठी मैदानात उतरतात. आता, पुन्हा एकदा राहुल गांधींच्या भाषणातील त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. यावेळी, राहुल गांधींनी माध्यमांना लक्ष्य करताना अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा नामोल्लेख केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत त्यांनी ४ वेळा ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाव घेतले आहे. 

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. या यात्रेदरम्यान भाषण करताना ते काही उदाहरणं देत केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करतात. मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख केला. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत बोलावलं होतं. पण, तिथे गोरगरिब दिसले नाहीत, असे राहुल गांधींनी म्हटले. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय उपस्थित नव्हती. तर, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची उपस्थिती होती. त्यामुळे, नेटीझन्सकडून राहुल गांधींना ट्रोल केलं जात आहे. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अब्जाधीशांना बोलावलं, सेलिब्रिटींना बोलावलं. पण, आदिवासी, मागास व गोरगरिबांना बोलावलं नाही. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनाही या सोहळ्याला बोलावलं नाही. हा आदिवासी समाजाचा अपमान होता, असे म्हणत राहुल गाधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. युपीतील प्रतापगड जिल्ह्याच्या रामपूर खास येथील इंदिरा चौकात भाषण करताना राहुल गांधींनी हे उदाहरण दिलं. केवळ उद्योगपती आणि अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देऊन मोदी सरकारमध्ये देशातील ७३ टक्के सर्वसामान्य जनतेला काही किंमत नसल्याचे दाखवून दिल्याचंही राहुल यांनी म्हटलं. 

माध्यमांमध्येही सर्वसामान्यांचा आवाज ऐकू येत नाही. मीडियात दिवसभर मोदींना दाखवले जाते, त्यानंतर ऐश्वर्या राय नाचताना दिसून येते, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन भल्ले भल्ले करताना निघून जाईल, असे म्हणत राहुल यांनी माध्यमांनाही लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांनी आपल्या भाषणाचा स्तर खाली येऊ देऊ नये, असेही काहींनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश