शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात! घरच्यांचा विरोध पण कोर्टाची परवानगी; प्रीती अन् काजल करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 19:56 IST

दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत.

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील दोन मैत्रिणी एकमेकांसोबत सातफेरे घेणार आहेत. दोन्ही कुटुंबीयांनी समजावून देखील काजल आणि प्रीती त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या. घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी धाडसी निर्णय घेत घर सोडले. मुलींनी अखेरपर्यंत कोणाचेच न ऐकल्याने कुटुंबीयांना देखील होकार द्यावा लागला. कोर्टाने देखील दोघींना एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. 

बिजनोर येथील एका गावातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. येथील प्रीती उत्तराखंड इथे एका फॅक्टरीत काम करायची. तिथेच तिची मैत्री मुरादाबाद येथील काजलसोबत झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी दोन्हीकडील कुटुंबीयांचा विरोध होता. घरच्यांचा वाढता विरोध पाहता प्रीती आणि काजल ५ दिवस घरातून फरार झाल्या. यानंतर प्रीतीच्या वडिलांनी स्थानिक पोलिस स्थानकात काजलविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुरूवारी या दोघी पोलिसांच्या पथकाला सापडल्या. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना बोलावून त्यांची समजूत काढली. 

मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात!दरम्यान, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर देखील प्रीती आणि काजल या एकत्र राहण्यावर ठाम होत्या. त्या कोणत्याही परिस्थितीत एकमेकांपासून दूर राहण्यास तयार नव्हत्या. जबरदस्ती केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना बिजनोर सीजेएम कोर्टात हजर करण्यात आले. जिथे दोघींचे जबाब नोंदवण्यात आले. कोर्टातही प्रीती आणि काजल यांनी एकत्र राहण्यावर ठाम असल्याचे सांगितले. नंतर दोघीही लग्नासाठी पात्र असल्याची खात्री झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली. 

प्रीती अन् काजल करणार लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली घरातून निघून गेल्या होत्या. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे कलम १६४ अंतर्गत दोघींचेही जबाब घेण्यात आले. त्या दोघीही एकत्र राहण्यावर ठाम आहेत. त्यावर न्यायालयाने दोघींनाही प्रौढ मानले आणि त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची परवानगी दिली. यानंतर दोन्ही मुली एकत्र निघून गेल्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या कुठे गेल्या आहेत हे सांगणे योग्य ठरणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नCourtन्यायालयPoliceपोलिस