शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 22:55 IST

या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (17 डिसेंबर) उत्तर प्रदेशातील वारानसीमध्ये काशी-तमिळ संगमममध्ये भाषण करताना नवा प्रयोग केला. त्यांच्या भाषणाचा तमिळ भाषेत अनुवाद करण्यासाठी आर्टिफिशअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला. याचे लोकांनीही स्वागत केले आहे. 

काय म्हणाले पंतप्रधान मोदी -या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल."

काशी-तमिळचे अद्भुत नाते -मोदी म्हणाले, ''काशी-तमिळचे अद्भुत नाते आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संखेने शेकडो किलोमीटर अंतर पूर्ण करून काशीमध्ये आला आहात. आपण येथे अतिथी म्हणून नव्हे तर माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून आला आहात. मी आपल्या सर्वांचे 'काशी-तमिळ संगमम'मध्ये स्वागत करतो."

"तमिळनाडूहून काशीमध्ये येण्याचा अर्थ, महादेवाच्या एका घरातून त्यांच्याच दुसऱ्या घरात येणे असा आहे. तमिळनाडूहून काशीत येण्याचा अर्थ मदुराई मीनाक्षीकडून काशी विशालाक्षीकडे येणे असा आहे. यामुळेच तमिलनाडू आणि काशीकर यांच्या हृदयात जे प्रेम आहे, जो संबंध आहे, तो वेगळा आणि अद्वितीय आहे," असे मोदी म्हणाले.

काशीच्या विद्यार्थ्याचा उल्लेख - पंतप्रधान मोदी म्हणाले, "एके काळी काशीचे विद्यार्थी राहिलेल्या सुब्रमण्य भारती यांनी लिहिले होते की, 'काशी नगर पुलवर् पेसुम् उरैताम् कान्चियिल् केट्पदर्कु ओर् करुवि सेय्वोम्', त्यांना म्हणायचे होते की, काशीमध्ये जे मंत्रोच्चार होतात, ते तामिळनाडूतील कांची शहरात एकण्याची व्यवस्था झाली तर कीती चांगले होईल. आज सुब्रमण्य भारती यांची ती इच्छा पूर्ण होत आहे."

'विविधतेत आत्मीयतेचे सहज आणि श्रेष्ठ स्वरूप आपल्याला क्वचितच कुठे बघायला मिळेल' -पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा आपल्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या काशीवर आक्रमणे होत होती, तेव्हा राजा पराक्रम पांडियन यांनी तेनकाशी आणि शिवकाशी येथे, असे म्हणत मंदिरे उभारली की, काशी नष्ट केली जाऊ शकत  नाही. जगातील कुठल्याही सभ्यतेवर नजर टाका, आपल्याला विविधतेत आत्मीयतेचे एवढे सहज आणि श्रेष्ठ स्वरूप क्वचितच कुठे बघायला मिळेल" 

पंतप्रधान म्हणाले, ''काशी-तमिळ संगमचा आवाज संपूर्ण देशभरात आणि जगभरात पोहोचत आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्व संबंधित मंत्रालये, उत्तर प्रदेश सरकार आणि तमिळनाडूतील सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो.'' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीBJPभाजपाArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स