शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

40 कोटी भाविक, 2 लाख कोटींचा रेव्हेन्यू...; महाकुंभद्वारे इकोनॉमीला मिळणार बूस्ट! CM योगींनी सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:57 IST

महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा  अंदाज आहे...

यावेळी महाकुंभमध्ये 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. यातून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत रेव्हेन्यू जनरेशन वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी म्हटले आहे. अधिकृत निवेदनानुसार, एका आघाडीच्या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'Divine Uttar Pradesh: The Must Visit Sacred Journey' सम्मेलनात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.

महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा  अंदाज आहे. एवढेच नाही तर, 2024 मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी 16 कोटीहून अधिक भाविक आले. तर अयोध्येत 13.55 कोटीहून अधिक भाविक आले आहेत, असेही मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.

एका प्रेस नोटद्वारे मुख्यमंत्री म्हणाले, "13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभमेळ्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना महत्त्व मिळेल. तसेच, महाकुंभचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व सांगताना ते म्हणाले, हे आयोजन म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतिकही आहे. यावेळी, हा महाकुंभ म्हणजे, जगातील सर्वात मोठे अस्थायी शहर आहे, येथे कुठल्याही क्षणी 50 लाक ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे," असेही योगी म्हणाले.

कुंभमेळ्याव्याची तयारी - संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संगमच्या 12 किलोमीटर परिसरात स्नान घाट तयार केले जात आहेत. स्वच्छता, बांधकाम आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. याशिवाय सर्व घाटांवर प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे."

जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, "महिलांसाठी सर्व घाटांवर स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घाटावर वेगवेगळे चिन्ह (डमरू, त्रिशूळ इ.) लावण्यात आले आहेत." जेणेकरून लोकांना ते सहजपणे ओळखता येतील." या शिवाय, महाकुंभाला होणाऱ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. संगम परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारले जात आहेत आणि सर्व घाटांवर पाण्याला बॅरिकेडिंगचीव्यवस्था केली जात आहे.

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथEconomyअर्थव्यवस्थाBJPभाजपा