शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

40 कोटी भाविक, 2 लाख कोटींचा रेव्हेन्यू...; महाकुंभद्वारे इकोनॉमीला मिळणार बूस्ट! CM योगींनी सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:57 IST

महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा  अंदाज आहे...

यावेळी महाकुंभमध्ये 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. यातून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत रेव्हेन्यू जनरेशन वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी म्हटले आहे. अधिकृत निवेदनानुसार, एका आघाडीच्या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'Divine Uttar Pradesh: The Must Visit Sacred Journey' सम्मेलनात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.

महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा  अंदाज आहे. एवढेच नाही तर, 2024 मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी 16 कोटीहून अधिक भाविक आले. तर अयोध्येत 13.55 कोटीहून अधिक भाविक आले आहेत, असेही मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.

एका प्रेस नोटद्वारे मुख्यमंत्री म्हणाले, "13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभमेळ्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना महत्त्व मिळेल. तसेच, महाकुंभचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व सांगताना ते म्हणाले, हे आयोजन म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतिकही आहे. यावेळी, हा महाकुंभ म्हणजे, जगातील सर्वात मोठे अस्थायी शहर आहे, येथे कुठल्याही क्षणी 50 लाक ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे," असेही योगी म्हणाले.

कुंभमेळ्याव्याची तयारी - संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संगमच्या 12 किलोमीटर परिसरात स्नान घाट तयार केले जात आहेत. स्वच्छता, बांधकाम आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. याशिवाय सर्व घाटांवर प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे."

जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, "महिलांसाठी सर्व घाटांवर स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घाटावर वेगवेगळे चिन्ह (डमरू, त्रिशूळ इ.) लावण्यात आले आहेत." जेणेकरून लोकांना ते सहजपणे ओळखता येतील." या शिवाय, महाकुंभाला होणाऱ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. संगम परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारले जात आहेत आणि सर्व घाटांवर पाण्याला बॅरिकेडिंगचीव्यवस्था केली जात आहे.

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथEconomyअर्थव्यवस्थाBJPभाजपा