शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

40 कोटी भाविक, 2 लाख कोटींचा रेव्हेन्यू...; महाकुंभद्वारे इकोनॉमीला मिळणार बूस्ट! CM योगींनी सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:57 IST

महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा  अंदाज आहे...

यावेळी महाकुंभमध्ये 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. यातून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत रेव्हेन्यू जनरेशन वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी म्हटले आहे. अधिकृत निवेदनानुसार, एका आघाडीच्या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'Divine Uttar Pradesh: The Must Visit Sacred Journey' सम्मेलनात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.

महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा  अंदाज आहे. एवढेच नाही तर, 2024 मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी 16 कोटीहून अधिक भाविक आले. तर अयोध्येत 13.55 कोटीहून अधिक भाविक आले आहेत, असेही मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.

एका प्रेस नोटद्वारे मुख्यमंत्री म्हणाले, "13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभमेळ्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना महत्त्व मिळेल. तसेच, महाकुंभचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व सांगताना ते म्हणाले, हे आयोजन म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतिकही आहे. यावेळी, हा महाकुंभ म्हणजे, जगातील सर्वात मोठे अस्थायी शहर आहे, येथे कुठल्याही क्षणी 50 लाक ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे," असेही योगी म्हणाले.

कुंभमेळ्याव्याची तयारी - संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संगमच्या 12 किलोमीटर परिसरात स्नान घाट तयार केले जात आहेत. स्वच्छता, बांधकाम आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. याशिवाय सर्व घाटांवर प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे."

जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, "महिलांसाठी सर्व घाटांवर स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घाटावर वेगवेगळे चिन्ह (डमरू, त्रिशूळ इ.) लावण्यात आले आहेत." जेणेकरून लोकांना ते सहजपणे ओळखता येतील." या शिवाय, महाकुंभाला होणाऱ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. संगम परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारले जात आहेत आणि सर्व घाटांवर पाण्याला बॅरिकेडिंगचीव्यवस्था केली जात आहे.

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथEconomyअर्थव्यवस्थाBJPभाजपा