शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 08:30 IST

अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी भाजपचा अयोध्येतील पराभव लाजिरवाणा असल्याचे म्हणत, पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला अयोध्येतच पराभवाचा  सामना करावा लागला आहे. येथून समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी भाजपचा अयोध्येतील पराभव लाजिरवाणा असल्याचे म्हणत, पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

अयोध्यातील पराभवावर काय म्हणाले? -अयोध्येत भाजपच्या झालेल्या पराभवावर बोलताना हनुमान गढीचे महंत राजूदास म्हणाले, "हे दुःखद आहे. अयोध्येसारख्या शहराला 32 ते 38 लाख कोटी रुपयांचे बजेट देऊन मुख्यमंत्री योगी आणि पीएम मोदींनी विकासाचा प्रयत्न केला आणि पराभूत झाले.  अयोध्या विधानसभा सुरुवातीपासून भाजपसोबत होती आणि यावेळीही आम्ही अयोध्या त्यांच्याकडेच दिली आहे." 

ते म्हणाले, 'यावेळी विजयाचा आकडा फार आनंद देणारा नाही. हे निंदनीय आणि दु:खद आहे. मात्र, आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेले की, आता सनातनची बाजू घेऊन कोण बोलणार? हिंदू धर्माच्या बाजूने कोण बोलणार? सनातन संस्कृतीवर कोण बोलणार?

भाजपवरही साधला निशाणा -भाजप नेत्यांवर निशाणा साधत महंत म्हणाले, "मी भाजप नेत्यांना सांगू इच्छितो की, कान उघडून ऐका, जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देणार नाही, जेव्हा तुमचे पोलीस, तहसीलदार, एसडीएम, डीएम ऐकणार नाहीत. जेव्हा पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण होईल तेव्ह अशीच स्थिती येईल. आता तर एवढेच आहे, 27 चा ट्रेलर ठीक राहणार नाही."

सोशल मीडियावरही प्रश्नचिन्ह -यापूर्वी, हनुमान गढीचे महंत राजूदास यांनी सोशल मीडियावर लिहिले होते, 'रामायणात रामजींनी रावणासोबत युद्ध करण्यासाठी वानरांना आणि अस्वलाला नेले, हे बरो झाले! जर अयोध्येतील लोकांना नेले असते तर, यांनी लंकेतील सोन्याच्या नादात रावणासोबतही तडजोड केली असती." 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिर