शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 08:30 IST

अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी भाजपचा अयोध्येतील पराभव लाजिरवाणा असल्याचे म्हणत, पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला अयोध्येतच पराभवाचा  सामना करावा लागला आहे. येथून समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी भाजपचा अयोध्येतील पराभव लाजिरवाणा असल्याचे म्हणत, पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

अयोध्यातील पराभवावर काय म्हणाले? -अयोध्येत भाजपच्या झालेल्या पराभवावर बोलताना हनुमान गढीचे महंत राजूदास म्हणाले, "हे दुःखद आहे. अयोध्येसारख्या शहराला 32 ते 38 लाख कोटी रुपयांचे बजेट देऊन मुख्यमंत्री योगी आणि पीएम मोदींनी विकासाचा प्रयत्न केला आणि पराभूत झाले.  अयोध्या विधानसभा सुरुवातीपासून भाजपसोबत होती आणि यावेळीही आम्ही अयोध्या त्यांच्याकडेच दिली आहे." 

ते म्हणाले, 'यावेळी विजयाचा आकडा फार आनंद देणारा नाही. हे निंदनीय आणि दु:खद आहे. मात्र, आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेले की, आता सनातनची बाजू घेऊन कोण बोलणार? हिंदू धर्माच्या बाजूने कोण बोलणार? सनातन संस्कृतीवर कोण बोलणार?

भाजपवरही साधला निशाणा -भाजप नेत्यांवर निशाणा साधत महंत म्हणाले, "मी भाजप नेत्यांना सांगू इच्छितो की, कान उघडून ऐका, जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देणार नाही, जेव्हा तुमचे पोलीस, तहसीलदार, एसडीएम, डीएम ऐकणार नाहीत. जेव्हा पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण होईल तेव्ह अशीच स्थिती येईल. आता तर एवढेच आहे, 27 चा ट्रेलर ठीक राहणार नाही."

सोशल मीडियावरही प्रश्नचिन्ह -यापूर्वी, हनुमान गढीचे महंत राजूदास यांनी सोशल मीडियावर लिहिले होते, 'रामायणात रामजींनी रावणासोबत युद्ध करण्यासाठी वानरांना आणि अस्वलाला नेले, हे बरो झाले! जर अयोध्येतील लोकांना नेले असते तर, यांनी लंकेतील सोन्याच्या नादात रावणासोबतही तडजोड केली असती." 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिर