शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून या गावात लग्नासाठी कुणी मुलगी देईना, संतप्त अविवाहित तरुणांनी केली मतदानावर बहिष्काराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:09 IST

Lok Sabha Election 2024: सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल ही आवश्यक बाब बनली आहे. लोक मोबाइलच्या माध्यमातून अनेक गोष्टी घरबसल्या करत असतात. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मोबाइल हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये एक असा भाग आहे जेथील सुमारे ३० हजारांहून अधिक लोक मोबाइलशिवाय जीवन जगत आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांना आता त्यांचे नातेवाईकही टाळू लागले आहेत. एवढंच नव्हे तर या भागातील तरुणांसोबत लग्न करण्यासही तरुणी तयार होत नाही आहेत.

हा भाग बहराइच जिल्ह्यातील मोतीपूर तालुक्यातील इंडो-नेपाळ सीमा परिसरात आहे. या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सरकारकडून अनेक योजनांचा लाभ मिळतो. मात्र दूरसंचार व्यवस्था नसल्याने हा भाग बाह्य जगापासून तुटला आहे. मोबाइल नेटवर्कच्या समस्येबाबत येथील रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार झाले आहेत. मात्र या समस्येवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

या भागात बर्दिया, आमा, विशुनापूर, फकीरपुरी, बिछिया, रमपुरवा मटेही, भवानीपूर, कैलाश पुरी, भरथारपूर या गावांचा समावेश होतो. तसेच इथे सुमारे ३० हजारांहून अधिक ग्रामस्थ राहतात. ते सातत्याने मोबाइलच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करत आहेत. या गावांमधील सरपंचांनीही ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.  

येथील ग्रामस्थांना सरकारी योजनांमधून खूप लाभ मिळाला आहे. मात्र येथे मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. बिछिया येथे बीएसएनएलचा एक टॉवर आहे. मात्र तो कार्यान्वित झालेला नाही, आता येथील ग्रामस्थांकडून खाजगी कंपनीचा टॉवर लावण्याची मागणी केली जात आहे. येथील ग्रामस्थांनी आपली समस्या मांडताना सांगितलं की, येथे राहत असलेल्या तरुण तरुणींना लग्न करण्यासाठी जोडीदार मिळत नाही आहे. जे नातेवाईक आहेत. त्यांचं नातेवाईकांशी बोलणं होत नाही आहे. आम्ही लोक देश आणि जगापासून तुटलेले आहोत, अशी व्यथाही या लोकांनी मांडली.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश