शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

...म्हणून या गावात लग्नासाठी कुणी मुलगी देईना, संतप्त अविवाहित तरुणांनी केली मतदानावर बहिष्काराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:09 IST

Lok Sabha Election 2024: सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल ही आवश्यक बाब बनली आहे. लोक मोबाइलच्या माध्यमातून अनेक गोष्टी घरबसल्या करत असतात. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मोबाइल हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये एक असा भाग आहे जेथील सुमारे ३० हजारांहून अधिक लोक मोबाइलशिवाय जीवन जगत आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांना आता त्यांचे नातेवाईकही टाळू लागले आहेत. एवढंच नव्हे तर या भागातील तरुणांसोबत लग्न करण्यासही तरुणी तयार होत नाही आहेत.

हा भाग बहराइच जिल्ह्यातील मोतीपूर तालुक्यातील इंडो-नेपाळ सीमा परिसरात आहे. या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सरकारकडून अनेक योजनांचा लाभ मिळतो. मात्र दूरसंचार व्यवस्था नसल्याने हा भाग बाह्य जगापासून तुटला आहे. मोबाइल नेटवर्कच्या समस्येबाबत येथील रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार झाले आहेत. मात्र या समस्येवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

या भागात बर्दिया, आमा, विशुनापूर, फकीरपुरी, बिछिया, रमपुरवा मटेही, भवानीपूर, कैलाश पुरी, भरथारपूर या गावांचा समावेश होतो. तसेच इथे सुमारे ३० हजारांहून अधिक ग्रामस्थ राहतात. ते सातत्याने मोबाइलच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करत आहेत. या गावांमधील सरपंचांनीही ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.  

येथील ग्रामस्थांना सरकारी योजनांमधून खूप लाभ मिळाला आहे. मात्र येथे मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. बिछिया येथे बीएसएनएलचा एक टॉवर आहे. मात्र तो कार्यान्वित झालेला नाही, आता येथील ग्रामस्थांकडून खाजगी कंपनीचा टॉवर लावण्याची मागणी केली जात आहे. येथील ग्रामस्थांनी आपली समस्या मांडताना सांगितलं की, येथे राहत असलेल्या तरुण तरुणींना लग्न करण्यासाठी जोडीदार मिळत नाही आहे. जे नातेवाईक आहेत. त्यांचं नातेवाईकांशी बोलणं होत नाही आहे. आम्ही लोक देश आणि जगापासून तुटलेले आहोत, अशी व्यथाही या लोकांनी मांडली.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश