शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात, टायर फुटला आणि डंपरला धडकून कारला लागली आग, ८ जणांचा जळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 08:22 IST

Bareilly Car Accident: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात कारमधून प्रवास करत असलेल्या ८ जणांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बरेली-नैनीताल महामार्गावर शनिवारी रात्री ११ वाजता झाला.

 उत्तर प्रदेशमधील बरेली येथे शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात कारमधून प्रवास करत असलेल्या ८ जणांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बरेली-नैनीताल महामार्गावर शनिवारी रात्री ११ वाजता झाला. मारुती इर्टिगा कारचा टायर फुटून ती डिव्हायडर ओलांडून पलीकडून जाणाऱ्या डंपरला धडकली. अपघातानंतर कार लॉक झाली आणि तिला आग लागली. यात कारमधून प्रवास करत असलेल्या आठ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. 

अपघाताचे वृत्त समजल्यानंतर एसएसपी बरेली आणि आयजी बरेली रेंज डॉ. राकेश कुमार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांपैकी तीन जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार कारमधील प्रवासी हे एक लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते. त्यावेळीच हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बरेलीचे एसएसपी सुशील चंद्रभान घुले यांनी सांगितले की, महामार्गावरील भोजीपुराजवळ कार ट्रकवर आदळून हा अपघात झाला. त्यानंतर कार फरफटत गेली आणि तिला आग लागली. तसेच अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने आतील प्रवासी अडकून पडले आणि आगीमध्ये जळून त्यांचा मृत्यू झाला. प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार