शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

"भोलेबाबा परम ब्रह्म, ज्यांचं मरण आलं होतं, त्यांचाच जीव गेला’’, सूरजपाल यांच्या सेवेकऱ्याचा दावा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:55 IST

Hathras stamped Update: हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी सत्संगाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं ढिसाळ नियोजन आणि येथे प्रवचन देणारे भोलेबाबा यांना दोषी ठरवण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही भोलेबाबांच्या अनुयायांचं त्यांच्यावरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेसाठी सत्संगाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं ढिसाळ नियोजन आणि येथे प्रवचन देणारे भोलेबाबा यांना दोषी ठरवण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही भोलेबाबांच्या अनुयायांचं त्यांच्यावरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही आहे. भोलेबाबांच्या आश्रमात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या सत्यवान नावाच्या एका सेवेकऱ्याने बाबा परम ब्रह्म असून, त्यांच्या चरणाच्या धुळीमुळे लोकांचे कष्ट कमी होतात. आमचे बाबा परम ब्रह्म आहेत. त्यांची सर्वांची निर्मिती केली आहे. ज्या लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, त्यांचं मरण जवळ आलं होतं, असा दावा भोलेबाबांच्या सेवेकऱ्यांनी केला आहे. 

सत्यवान याने सांगितले की, हा आश्रम येथीलच एका सेवेकऱ्याने आपल्या दान दिलेल्या जमिनीवर बांधण्यात आला आहे. ग्वाल्हेर, कानपूर, लखनौ, शाहजहांपूर, दिल्ली आणि इतर ठिकाणीही त्यांचे आश्रम आहेत. बाबाजी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांचेही दौरे करून आलेले आहेत.  

या सत्संगासाठी बहराइस येथून बसमधून काही अनुयायी आले होते. सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांमी सांगितले की, ते पहिल्यांदाच या सत्संगाला आले होते. आम्हाला हे बाबा मानव आहेत की देव हे पाहायचे होते. आमच्या बसमध्ये एक आई आणि मुलगी होती. ते बेपत्ता आहेत. तसेच आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहोत.  

दरम्यान, हाथरसमधील दुर्घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाथरसमधील रुग्णालयात ३२ मृतदेह आले आहेत. त्यातील १९ जणांची ओळख पटली आहे.  शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले जात आहेत. दरम्यान, एक महिला पोलीस कर्मचारीही बेशुद्ध झाली होती. ती आता ठीक आहे. तिला घरी पाठवण्यात आले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत