शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"भोलेबाबा परम ब्रह्म, ज्यांचं मरण आलं होतं, त्यांचाच जीव गेला’’, सूरजपाल यांच्या सेवेकऱ्याचा दावा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:55 IST

Hathras stamped Update: हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी सत्संगाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं ढिसाळ नियोजन आणि येथे प्रवचन देणारे भोलेबाबा यांना दोषी ठरवण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही भोलेबाबांच्या अनुयायांचं त्यांच्यावरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेसाठी सत्संगाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं ढिसाळ नियोजन आणि येथे प्रवचन देणारे भोलेबाबा यांना दोषी ठरवण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही भोलेबाबांच्या अनुयायांचं त्यांच्यावरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही आहे. भोलेबाबांच्या आश्रमात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या सत्यवान नावाच्या एका सेवेकऱ्याने बाबा परम ब्रह्म असून, त्यांच्या चरणाच्या धुळीमुळे लोकांचे कष्ट कमी होतात. आमचे बाबा परम ब्रह्म आहेत. त्यांची सर्वांची निर्मिती केली आहे. ज्या लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, त्यांचं मरण जवळ आलं होतं, असा दावा भोलेबाबांच्या सेवेकऱ्यांनी केला आहे. 

सत्यवान याने सांगितले की, हा आश्रम येथीलच एका सेवेकऱ्याने आपल्या दान दिलेल्या जमिनीवर बांधण्यात आला आहे. ग्वाल्हेर, कानपूर, लखनौ, शाहजहांपूर, दिल्ली आणि इतर ठिकाणीही त्यांचे आश्रम आहेत. बाबाजी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांचेही दौरे करून आलेले आहेत.  

या सत्संगासाठी बहराइस येथून बसमधून काही अनुयायी आले होते. सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांमी सांगितले की, ते पहिल्यांदाच या सत्संगाला आले होते. आम्हाला हे बाबा मानव आहेत की देव हे पाहायचे होते. आमच्या बसमध्ये एक आई आणि मुलगी होती. ते बेपत्ता आहेत. तसेच आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहोत.  

दरम्यान, हाथरसमधील दुर्घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाथरसमधील रुग्णालयात ३२ मृतदेह आले आहेत. त्यातील १९ जणांची ओळख पटली आहे.  शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले जात आहेत. दरम्यान, एक महिला पोलीस कर्मचारीही बेशुद्ध झाली होती. ती आता ठीक आहे. तिला घरी पाठवण्यात आले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत