शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सौदीच्या प्रिंससोबत बोलून हजचा कोटा वाढवला, PM नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजासाठी काय-काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 18:42 IST

...केवळ श्रीमंत लोकांनाच हजला जाण्याची संधी मिळायची. मात्र आता हज कोटा वाढवण्याबरोबरच व्हिसाचे नियमही सोपे करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे.

पूर्वी हजचा कोटा कमी असल्याने किती मारामार व्हायची, त्यातही लाचखोरी होत होती. केवळ श्रीमंत लोकांनाच हजला जाण्याची संधी मिळायची. मात्र आता हज कोटा वाढवण्याबरोबरच व्हिसाचे नियमही सोपे करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे. ते सोमवारी अलीगडमध्ये हाथरस आणि अलीगड लोकसभेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ एका प्रचारसभेत बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "काँग्रेस आणि सपासारख्या पक्षांनी नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले. मुस्लिमांच्या उन्नतीसाठी काही केले नाही. मी जेव्हा पसमंदा मुस्लिमांच्या दुरवस्थेसंदर्भात बोलतो, तेव्हा त्यांना टेन्शन येते. 

मोदी म्हणाले, "पूर्वी हज कोटा कमी असल्याने त्यात लाचखोरी चालायची. केवळ श्रीमंत लोकांनाच हजला जाता येत होते. मी सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सला विनंती केली होती की, भारतातील आमच्या मुस्लिम बांधवांसाठी हज कोटा वाढविण्यात यावा. आज, भारताचा हज कोटा तर वाढलाच, शिवाय, व्हिसा नियमही सोपे केले आहेत. सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. पूर्वी मुस्लीम माता-भगिनी एकट्याने हजला जाता येत नव्हते. आता सरकारने मेहरमाशिवाय हजला जाण्याची परवानगी दिली आहे. आज अशा हजारो भगिनी मला आशीर्वाद देत आहेत, ज्यांचे हजला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

अलीगडमधील कर्फ्यूवर फुल स्टाप -नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी फुटीरतावादी कलम 370 च्या नावाने अभिमानाने राहत होते. आमच्या सैनिकांवर दगडफेक करत होते. मात्र आता, भाजप सरकारच्या काळात याला पूर्णविराम मिळाला आहे. अलिगडमध्ये पूर्वी रोज कर्फ्यू असायचा, आता ते संपले आहे. हे योगी सरकारने आपल्याला करून दिले आहे.

 "दंगली, हत्या, गँगवॉर, खंडणी हे सर्व सपा सरकारचा ट्रेडमार्क होता. हीच त्यांची ओळख होती, यावरच त्यांचे राजकारण चालत होते. मात्र, योगीजींच्या सरकारमध्ये, नागरिकांची शांतत बिघडवण्याची गुन्हेगारांची हिंमत नाही," असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Muslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदी